शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

रोजगार सेवकांच्या समस्यांची दखल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:28 IST

शासनाच्या विविध योजनांपैकी त्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्यापकाळ योजना ...

प्रश्न रोजीरोटीचा : मानधनाची मागणी, वर्षापासून प्रवास भत्ता नाही लोकमत न्यूज नेटवर्कपहेला : शासनाच्या विविध योजनांपैकी त्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्यापकाळ योजना आदी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनापेक्षाही अगदी कमी पैशात राज्य शासन रोजगार सेवकांना हमालासारखे वर्षभरही राबवत आहे. वेळोवेळी त्यांच्याकडून विविध प्रकारचे कामे करवून घेत आहे. तेही अगदी फुकटात. एकंदरीत महिन्याला फक्त ८ दिवसांचे प्रति दिवस केवळ २५ रुपये प्रमाणे नास्त्याचे म्हणून देत आहेत. ते सुध्दा आता वर्षभरापासून मिळालेले नाही. तेव्हा रोजगार सेवकांनी या नास्त्यावरच किती दिवस काढायेच, असा प्रश्न रोजगार सेवकांना पडला आहे.अंगमेहनतीची अकुशल कामे करण्याच्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा व ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबावे, या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारित केला. या कायद्यान्वये ग्रामीण भागातील कुटूंबाला एका वर्षात १०० दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्याची हमी देण्यात आली.ही योजना राबविताना ग्रामसेवकांच्या मदतीला ग्राम रोजगार सेवक देण्यात आला. परंतु काही दिवसातच ग्रामसेवक यांनी रोजगार हमी योजनेतून आपली जबाबदारी काढून घेतली. यापूर्वीसुध्दा ग्रामसेवकांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर बहिष्कार घातला होता त्या वेळेस सर्वच कामे रोजगार सेवकांनी सांभाळून मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली. प्रत्येक रोजगार सेवकांकडे एवढे काम आहे की सतत रेकार्ड तयार करेल तरी त्याला त्याचे कामे संपत नाही. त्यात सतत चालणारी मजुरांची नोंदणी, त्यांचे जॉब कार्ड बनविणे, कामे उपलब्ध करुन देणे, तसेच शासनाकडून मिळालेले विविध नमुने अद्यावत करणे, मजुरांची डिमांड यादी देणे, मस्टर आणणे, मस्टर भरणे, भरलेले मस्टर पंचायत समितीमध्ये नेवून देणे, अशी कितीतरी कामे रोजगार सेवकांना करावी लागतात. या सर्व कामासाठी रोजगार सेवकांना महिन्यातून १० ते १५ दिवस पंचायत समितीमध्ये स्वत:च्या खर्चाने जावे लागते. नंतर काही दिवसांनी शासनाकडून प्रवास खर्च दिल्या जाते. आज एक वर्ष लोटला तरी बहुतेक रोजगार सेवकांचा त्यात कुणाचे एक वर्षाचा, कुणाचा सहा महिन्याचा, काहीचा ९ महिन्यांचा प्रवास खर्च शासनाकडून अद्याप मिळालेला नाही. तेव्हा कोठपर्यंत रोजगार सेवकांनी पंचायत समितीमधये जाण्या-येण्याचा खर्च कोठून करावा.ज्यावेळेस अकुशल स्वरुपाची कामे सुरु असतात त्यावेळेस झालेल्या अकुशल खर्चावर रोजगार सेवकांना २.२५ टक्के कमीशन दिल्या जाते. मात्र इतर कामे करताना त्यांना एक दमडीही मिळत नाही. एकंदरीत हिशेब लावला तर त्या रोजगार सेवकाला प्रति दिवस जास्तीत जास्त 25 रुपये मजुरी पडते. परंतु ज्या रोजगार सेवकाच्या हाताखाली मजूर म्हणून कामे करतात त्यांना शासनाने १ एप्रिल २०१७ पासून प्रति दिवस २०१ रुपये प्रमाणे मजुरी जाहिर केली आहे. परंतु पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे, गावातील मजुरांना कामे उपलब्ध करुन देणारे रोजगार सेवक दिवसाकाठी २५ रुपयांवर आपली गुजरान करीत आहेत. तेव्हा शासनाने याची दखल घेवून त्यांना मानधन लागू करण्याची अत्यंत गरज आहे.