शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आपण सर्व भाऊ-भाऊ, रेतीचा पैसा वाटून खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यात दशकभरापूर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. परंतु गोसेधरणात पाणी अडविल्यानंतर रेतीघाटांची संख्या कमी झाली. दुसरीकडे जिल्ह्याची जीवनदायीनी समजली जाणारी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे रेती तस्करांनी बंदीपुर्वीच शेकडो ब्रास रेतीचा उपसा करुन नदी काठावरील शेतशिवारात, जंगलात व अन्य ठिकाणी साठा करुन ठेवली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये तस्करी जोमात : प्रशासन म्हणते संयुक्त कारवाई, लिलावापूर्वी रेती साठविण्याची तस्करांमध्ये लागली स्पर्धा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील वैनगंगेच्या खोऱ्यातील रेती उत्कृष्ट दर्जाच्या रेतीची तस्करांनी वारेमाप वाट लावली आहे. रोज शेकडो ट्रॅक्टर व ट्रकांद्वारे रेतीची अवैध वाहतूक होत आहे. हा सर्व प्रकार जिल्हा प्रशासनाला माहित असूनही ‘आपण सर्व भाऊ - भाऊ, रेतीचा पैसा वाटून खावू’ या आशयाने सर्व कार्य सुरळीत सुरु आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे.जिल्ह्यात दशकभरापूर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. परंतु गोसेधरणात पाणी अडविल्यानंतर रेतीघाटांची संख्या कमी झाली. दुसरीकडे जिल्ह्याची जीवनदायीनी समजली जाणारी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे रेती तस्करांनी बंदीपुर्वीच शेकडो ब्रास रेतीचा उपसा करुन नदी काठावरील शेतशिवारात, जंगलात व अन्य ठिकाणी साठा करुन ठेवली आहे. याच डम्पिंग केलेल्या रेतीवर कधीकधीच महसूल प्रशासनाची नजर जात असते. जप्त केलेल्या रेतीचीही त्याच कंत्राटदाराला विक्री करण्याचा अफलातून प्रकारही घडला आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील रेतीघाट परिसर अतिसंवेदनशील झाले असून वाळू माफीया येथेच अधिक सक्रीय आहेत. याच भागातून मोठ्या प्रमाणात नागपूरसह अन्य जिल्ह्यात रेतीचा पुरवठा होत असतो. याशिवाय तुमसर, मोहाडी, भंडारा व साकोली तालुक्यातही रेतीची तस्करी सुरु आहे. बंदी असतानाही रेतीची डम्पींग झालीच कशी असा प्रश्न उपस्थित करुन यासाठी महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाविना हा प्रकार घडला कसा यावरही चिंतन करायला हवे.रेतीतस्करांवर संयुक्त कारवाईरेतीचे अवैध उत्खनन व वाहतूकीवर महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करावी या आशयाचे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. रेती वाहतुकीचा आढावा घेण्यासंदर्भात ही बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. जिल्ह्यातील रेती अन्य जिल्ह्यासह परराज्यात जात असल्याने याची दखल घेत पालकमंत्र्यांनी यावर कारवाई करण्यासंदर्भात सुचना केली असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची कितपत अंमलबजावणी होते, ही येणारी वेळ ठरविणार आहे. विशेष म्हणजे पवनी, निलज, जवाहरनगर, आंधळगाव व हिवरा या चेकपोस्टवर संबंधित तहसीलदारांनी एक कर्मचारी नियुक्त करावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच निलज-नागपूर-तामसवाडी या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले.७१ रेतीघाटांचे लिलावरेती घाट लिलाव करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ऐन पावसाळ्यात लिलाव प्रक्रिया सुरु झाली असली तरी ती पुर्णत्वास जाण्यास अजून महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. मात्र गत चार महिन्यांपासून रेतीच्या अनधिकृत उपस्याने जिल्हा प्रशासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व तस्करांच्या संगनमताने हा सर्व प्रकार घडत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील ७१ रेतीघाटांचे लिलाव करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु झाली आहे. पर्यावरण समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर अंतिम रुप देण्यात येईल.- रा.ल. गजभिये,जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया