शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

सिंगापुरातील शिक्षकांसारखा जोश महाराष्ट्रातील शिक्षणात आणायचायं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:57 IST

Bhandara : भंडारातील शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत शिक्षणमंत्र्यांचा मनोदय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपण काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये अभ्यास दौरा केला. तेथील शिक्षक हे शिक्षण एक फॅशन म्हणून स्वीकारतात. तशीच दृष्टी आणि जोश महाराष्ट्रातील शिक्षणात आणायचा आहे, असा निर्धार शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भंडाऱ्यातील शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत बुधवारी (६ ऑगस्ट) व्यक्त केला.

यावेळी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर, सदस्य यशवंत सोनकुसरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र सोनटक्के यांचेसह पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

दादा भुसे म्हणाले, राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. येत्या एक वर्षात जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या शाळांचे स्वरूप आणि गुणवत्तेमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याचा मानस आहे. जिल्हा परिषद शाळांमधील गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षण मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष निधी देण्यात येईल. जिल्हा परिषद शाळांवर विषयांच्या अनुषंगाने असणारा अतिरिक्त शैक्षणिक भार कमी करण्यासाठी एक नवी कार्यपद्धती तयार केली जाणार आहे. शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व एआय वापर सुरू असला तरी विद्यार्थ्यांची नाळ मातीशी तुटणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले.

शिक्षकांचे प्रश्न प्राथमिकतेने सोडविण्यासाठी ऑगस्टपूर्वीच समस्यांचे निराकरण अधिकाऱ्यांना करण्याचे निर्देश दिले. भविष्यात शिक्षकांना विविध कामांसाठी जिल्हा परिषद चकरा माराव्या लागणार नाहीत, यासाठी एक ठोस कार्यपद्धती तयार केली जाईल, असेही स्पष्ट केले. शिष्यवृत्ती परीक्षांचे विद्यार्थी वाढविण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केले.

राज्यगीत बंधनकारकराज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्य गीत गाणे बंधनकारक आहे आणि खासगी शाळांमध्येही मराठी शिक्षण अनिवार्य असतील, असे ठासून सांगत, संबंधित शाळांवर निरीक्षण करताना हे तपासण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल, तर कठोर कारवाईचा इशारा बैठकीत दिला. त्यामुळे आता अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. 

'आयडियल दहा शिक्षक'संकल्पना राज्यभर पोहोचविणार भंडारा जिल्ह्यातील 'आयडियल दहा शिक्षक' ही संकल्पना संपूर्ण राज्यभर हजारो शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद शाळांना मान्यता न मिळाल्याचा विषय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, स्वतःचे अधिकार वापरून प्रकरण निकाली काढावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. 

टॅग्स :bhandara-acभंडारा