शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आम्ही आमचे उरकून घेतो, तुम्ही येऊ नका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:01 IST

सध्या कोरोनाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. या तपत्या झळेत कोरोना विषाणू मरेल ही आशा मावळली आहे. लॉकडाउन वाढताच आहे. किती दिवस लग्न रोखून धरायचं म्हणून गावागावात 'सावधान' राहून लग्न विधी उरकले जात आहेत. ग्रामीण भागातील लग्न बहुधा मार्च, जूनपर्यंत चालत असतात. पण, मार्च महिन्यातच कोरोना विषाणू येवून धडकला. तो थांबता थांबेना. इकडे दोन परिवारातील नात्यांना एकत्र करण्यासाठी लग्नगाठ बांधायची तयारी करून घेतली होती

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या झळा : अनेकांनी बांधल्या रेशीमगाठी

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आमच्या मंगलकार्यास सहकुटुंब अगत्य येण्याचे करावे अशी विनंती विवाह निमंत्रण पत्रिकेत छापली जाते. पण, आता लग्न घराची मंडळी आपल्या आप्तेष्टांना ‘आम्ही थोडक्यात लग्न उरकून घेतो. तुम्ही लग्नाला येऊच नका’ अशी विनंती केली वर- वधू पक्षाकडून केली जात आहे.सध्या कोरोनाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. या तपत्या झळेत कोरोना विषाणू मरेल ही आशा मावळली आहे. लॉकडाउन वाढताच आहे. किती दिवस लग्न रोखून धरायचं म्हणून गावागावात 'सावधान' राहून लग्न विधी उरकले जात आहेत. ग्रामीण भागातील लग्न बहुधा मार्च, जूनपर्यंत चालत असतात. पण, मार्च महिन्यातच कोरोना विषाणू येवून धडकला. तो थांबता थांबेना. इकडे दोन परिवारातील नात्यांना एकत्र करण्यासाठी लग्नगाठ बांधायची तयारी करून घेतली होती . अखेर त्या दोन जीवांच नातं अधिक दृढ करण्यासाठी पुढे पाऊल घातले गेले. सहनशीलतेचा बांध फुटायला लागला. अन खेड्यात लग्नाचे बार उडायला सुरुवात झाली. ८ मे पासून मोहाडी येथील प्रशासनाने लग्न कार्य करण्याची परवानगी देण्यास सुरवात केली .प्रशासनाच्या अटीचे पालन करून अगदी सावधगिरीने अती सामान्यपणे लग्न विधी उरकून घेतली जात आहे. कमी लोकांत लग्न कसा आटोपून घेतला जाईल याची काळजी घेतली जात आहे. कोरोनाची तापाचा परिणाम लग्न कार्यावर झाला आहे. आत्याच्या लग्नाला यायचं हं... असं नातेवाईकांना आवार्जून सांगणारे आप्त आता आम्ही आमचे उरकून घेतो तुम्ही लग्नाला येऊ नका, असा आग्रह केला जात आहे. लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसवे- फुगवे कोरोनाने हिसकावून घेतले आहे. इच्छा असूनही आप्तेष्टांना दूर ठेवावे लागत आहे . मात्र आप्तांची दिलगिरी व्यक्त केली जात आहे. आप्तही अडचण समजून घेत आहेत.त्यामुळेमानपानाचा सोपस्कार विसरून आप्त फेसबुक, वाट्सएप आदी माध्यमातून आशीर्वाद देवू लागली आहेत. खेड्यात लग्न बहुधा रात्री होत. आता गावात पहाटे लग्न आटोपल्याची बातम्या आहेत. सकाळी नऊच्या आत झटपट लग्न सोहळे होत असतानाचे चित्र गावागावात दिसून येत आहेत. डीजेच्या ताल अन त्यावर थिरकणारी तरुणाई लग्नातला जल्लोष कुठेच दिसून येत नाही. जेवणाच्या रांगा पडत नाही. फार तर लग्नात पंचवीस-पन्नास लोकांमध्ये लग्न कार्य आटोपून घेत आहेत. लग्नात जास्त गर्दी म्हणजे रुबाब अन प्रतिष्ठा मोजली जात होती. आयुष्यभर लग्नाचा तोरा मिरवायचा पण या सर्व बाबींना सोयीस्करपणे फाटा दिला जात आहे. ही सर्व कोरोनाने बदल घडविले आहेत. तसेच, कोरोनाने विपरीत परिस्थितीत कसे जुळवून घ्यावे हे सांगितले आहे. शेतकरी कजार्चा ओझा सोसत, दु:ख सहन करत लेकरांच्या लग्नाची हौस फिटवत असे. पण, आज कजार्चा भार डोक्यावर घेऊ नका. कमी लोकांत, कमी खर्चातही छान लग्न पार पडू शकतात अश्या प्रतिक्रिया ग्रामीण भागात कानावर पडत आहे.१४ मे नंतर ४६१ लग्नसोहळ्याला परवानगीमोहाडी तालुक्यात ८ ते १३ मे पर्यंत तहसीलदार यांचेकडून २५४ लग्न कार्याची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मोहाडी व तुमसर तालुक्यात १४ मे नंतर ४६१ लग्नसोहळे करण्याची परवानगी देण्यात आली. तर गावात अनेक लग्न परवानगीविना पार पडले आहेत.

टॅग्स :marriageलग्न