शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आम्ही आमचे उरकून घेतो, तुम्ही येऊ नका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:01 IST

सध्या कोरोनाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. या तपत्या झळेत कोरोना विषाणू मरेल ही आशा मावळली आहे. लॉकडाउन वाढताच आहे. किती दिवस लग्न रोखून धरायचं म्हणून गावागावात 'सावधान' राहून लग्न विधी उरकले जात आहेत. ग्रामीण भागातील लग्न बहुधा मार्च, जूनपर्यंत चालत असतात. पण, मार्च महिन्यातच कोरोना विषाणू येवून धडकला. तो थांबता थांबेना. इकडे दोन परिवारातील नात्यांना एकत्र करण्यासाठी लग्नगाठ बांधायची तयारी करून घेतली होती

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या झळा : अनेकांनी बांधल्या रेशीमगाठी

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आमच्या मंगलकार्यास सहकुटुंब अगत्य येण्याचे करावे अशी विनंती विवाह निमंत्रण पत्रिकेत छापली जाते. पण, आता लग्न घराची मंडळी आपल्या आप्तेष्टांना ‘आम्ही थोडक्यात लग्न उरकून घेतो. तुम्ही लग्नाला येऊच नका’ अशी विनंती केली वर- वधू पक्षाकडून केली जात आहे.सध्या कोरोनाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. या तपत्या झळेत कोरोना विषाणू मरेल ही आशा मावळली आहे. लॉकडाउन वाढताच आहे. किती दिवस लग्न रोखून धरायचं म्हणून गावागावात 'सावधान' राहून लग्न विधी उरकले जात आहेत. ग्रामीण भागातील लग्न बहुधा मार्च, जूनपर्यंत चालत असतात. पण, मार्च महिन्यातच कोरोना विषाणू येवून धडकला. तो थांबता थांबेना. इकडे दोन परिवारातील नात्यांना एकत्र करण्यासाठी लग्नगाठ बांधायची तयारी करून घेतली होती . अखेर त्या दोन जीवांच नातं अधिक दृढ करण्यासाठी पुढे पाऊल घातले गेले. सहनशीलतेचा बांध फुटायला लागला. अन खेड्यात लग्नाचे बार उडायला सुरुवात झाली. ८ मे पासून मोहाडी येथील प्रशासनाने लग्न कार्य करण्याची परवानगी देण्यास सुरवात केली .प्रशासनाच्या अटीचे पालन करून अगदी सावधगिरीने अती सामान्यपणे लग्न विधी उरकून घेतली जात आहे. कमी लोकांत लग्न कसा आटोपून घेतला जाईल याची काळजी घेतली जात आहे. कोरोनाची तापाचा परिणाम लग्न कार्यावर झाला आहे. आत्याच्या लग्नाला यायचं हं... असं नातेवाईकांना आवार्जून सांगणारे आप्त आता आम्ही आमचे उरकून घेतो तुम्ही लग्नाला येऊ नका, असा आग्रह केला जात आहे. लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसवे- फुगवे कोरोनाने हिसकावून घेतले आहे. इच्छा असूनही आप्तेष्टांना दूर ठेवावे लागत आहे . मात्र आप्तांची दिलगिरी व्यक्त केली जात आहे. आप्तही अडचण समजून घेत आहेत.त्यामुळेमानपानाचा सोपस्कार विसरून आप्त फेसबुक, वाट्सएप आदी माध्यमातून आशीर्वाद देवू लागली आहेत. खेड्यात लग्न बहुधा रात्री होत. आता गावात पहाटे लग्न आटोपल्याची बातम्या आहेत. सकाळी नऊच्या आत झटपट लग्न सोहळे होत असतानाचे चित्र गावागावात दिसून येत आहेत. डीजेच्या ताल अन त्यावर थिरकणारी तरुणाई लग्नातला जल्लोष कुठेच दिसून येत नाही. जेवणाच्या रांगा पडत नाही. फार तर लग्नात पंचवीस-पन्नास लोकांमध्ये लग्न कार्य आटोपून घेत आहेत. लग्नात जास्त गर्दी म्हणजे रुबाब अन प्रतिष्ठा मोजली जात होती. आयुष्यभर लग्नाचा तोरा मिरवायचा पण या सर्व बाबींना सोयीस्करपणे फाटा दिला जात आहे. ही सर्व कोरोनाने बदल घडविले आहेत. तसेच, कोरोनाने विपरीत परिस्थितीत कसे जुळवून घ्यावे हे सांगितले आहे. शेतकरी कजार्चा ओझा सोसत, दु:ख सहन करत लेकरांच्या लग्नाची हौस फिटवत असे. पण, आज कजार्चा भार डोक्यावर घेऊ नका. कमी लोकांत, कमी खर्चातही छान लग्न पार पडू शकतात अश्या प्रतिक्रिया ग्रामीण भागात कानावर पडत आहे.१४ मे नंतर ४६१ लग्नसोहळ्याला परवानगीमोहाडी तालुक्यात ८ ते १३ मे पर्यंत तहसीलदार यांचेकडून २५४ लग्न कार्याची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मोहाडी व तुमसर तालुक्यात १४ मे नंतर ४६१ लग्नसोहळे करण्याची परवानगी देण्यात आली. तर गावात अनेक लग्न परवानगीविना पार पडले आहेत.

टॅग्स :marriageलग्न