शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खराशी गावाची स्मार्ट ग्रामकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांचा सहभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली. खराशी येथील ग्रामपंचायत इमारत, गावातील रस्ते, नाल्या तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह गावकरी मोलाचे योगदान देत आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरावर शाळेचा नावलौकीक : सामाजिक सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी गावाचा एकोपा

लोकमत न्यूज नेटवर्कखराशी : लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या काठावर वसलेली खराशी गाव जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून राज्यस्तरावर ओळख निर्माण झाली आहे. मात्र फक्त शिक्षणातच आघाडीवर नसून गावात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेत राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत एका चमूने खराशी येथे भेट दिली आहे. या चमूने गावात राबविलेल्या शैक्षणिक, सांस्कृतीक उपक्रमांसह हागणदारीमुक्त गाव, कर वसुली व्यवस्थापन, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांचा सहभाग, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबतची पाहणी केली.खराशी येथील ग्रामपंचायत इमारत, गावातील रस्ते, नाल्या तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह गावकरी मोलाचे योगदान देत आहे.गावात पिण्याच्या पाण्याचा नळयोजनेत ग्रामपंचायत यशस्वी ठरले आहेत. गावात असणाºया कच्चा रस्त्यांवर मात करीत सिमेंट, डांबरीकरण रस्ते तसेच गावात सभागृहासह इतर सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. गावाच्या विकासासाठी शिक्षकांसह संत आणि युवकांचा वाढता सहभाग अशी नवी ओळख होत आहे. युवकांच्या एकीमुळे गावात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. गावात आरोग्य व्यवस्थेवर विशेष भर असून गावातील आरोग्य उपकेंद्रात परिसरातील भागातून नागरिक उपचारासाठी येतो. येथील जिल्हा परिषद शाळा व रावजी फटे विद्यालय, विविकानंद विद्यालय हे शैक्षणिक क्षेत्र उल्लखनीय काम करत आहेत. गावात ग्रामसेवक, तलाठी, दवाखाना या शासकीय कर्मचाºयांमार्फत गावकºयांच्या अडचणी सोडविण्यात यश आले आहे. तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावातच मिटविले जातात. यासाठी शासनाने विशेष पुरस्कार दिला आहे.गावात विविध उपक्रमांसह जिल्ह्यात स्मार्टग्राम म्हणून खराशीचा नावलौकीक होईल, यासाठी सर्वांचा सहभाग असल्याचे उपसरपंच सुधन्वा चेटूले यांनी सांगितले. गावात शिवतिर्थ, मानव कल्याणकारी संस्था आणि बचत गट, भजनी मंडळ, क्रीडा मंडळ, वाचनालय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावाचा एकोपा टिकून आहे. खराशीच्या शाळेमुळे गावाचा नावलौकीक झालाच आहे. मात्र इतर उपक्रमांमुळे खराशी गावाची स्मार्ट ग्रामकडे वाटचाल सुरू आहे.गावकºयांच्या सहकार्यामुळे बऱ्याच गोष्टी शक्य होत आहे. महिलांच्या पुढाकाराने गावाचे नाव नक्कीच मोठे होईल.-अंकिता झलके, सरपंच खराशी.विविध विकास कामे गावात खेचून गावाला जिल्ह्यात नावलौकीक प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत आहोत. यासाठी सर्वांचा सहभाग मिळतो आहे.-सुधन्वा चेटूले, उपसरपंच खराशी.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान