शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

शेतकऱ्यांचा मदतनिधी परत जाण्याच्या मार्गावर

By admin | Updated: March 8, 2015 00:25 IST

शेतकऱ्यांनी खाते क्रमांक व संमतीपत्र तलाठ्याकडे न दिल्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आलेली मदत निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.

मोहाडी : शेतकऱ्यांनी खाते क्रमांक व संमतीपत्र तलाठ्याकडे न दिल्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आलेली मदत निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. याबाबत वारंवार सूचना देवूनही लाभार्थी शेतकऱ्यांनी खातेक्रमांक न दिल्याने निधी पडून आहे. पर्यायाने निधी शासनकडे परत जाण्याच्या मार्गावर आहे.मोहाडी तालुक्यात २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत ३,५७७ व खरीप हंगाम २०१४ तील ८४१ असे ४,४१८ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपले बँक खाते क्रमांक व संमतीपत्र तलाठ्याकडे न दिल्याने शासकीय अनुदानाची रक्कम वाटप करण्यात आली नाही. याबाबत दैनिक लोकमत वृत्तपत्रात २८ फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असूनसुद्धा अजूनपर्यंत उपरोक्त शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक दिलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी खाते क्रमांक दिले त्यांना मदतनिधी वाटप सुरु आहे. जून ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधीत ३५७७ शेतकरी व खरीप २०१४ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत खाते क्रमांक व संमतीपत्र संबंधित तलाठ्याकडे दिलेले नाहीत. यामुळे मदतनिधी वाटपात विलंब होत आहे. ७ मार्च पर्यंत बँक खाते क्रमांक संबंधित तलाठ्याकडे जमा करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते अप्राप्त आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्वरीत खातेक्रमांक द्यावे, असे आवाहन तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)