शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चुलबंद नदीत पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: June 26, 2016 00:25 IST

तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

साकोली तालुक्यात पाणीटंचाई : नागरिकांसह जनावरांनाही फटकासंजय साठवणे साकोली तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. चुलबंद नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजनाही ठप्प असून निम्न चुलबंद प्रकल्प शोभेची वस्तु ठरला आहे.अत्यल्प पावसामुळे चुलबंदच्या पात्रातील पाणी आटले. त्यामुळे परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील बहुतांश भागातील नळयोजना या विहीरीवर आहेत. या विहिरी ५० ते ६० फुट खोल आहेत. मात्र गावात शेतकऱ्याच्या शेतातील बोरवेल यापेक्षाही खोल आहेत. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरी खोल पडल्या. परिणामी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही विदारक स्थिती तालुक्याची आहे.जीवन प्राधिकरणाची योजना ठप्पसाकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणातर्फे साकोली येथे पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. या पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी चुलबंद प्रकल्पातून घेण्यात येणार होते. मात्र प्रकल्पाचे काम रखडल्याने व पाणीसाठा अत्यल्प असल्याने ही योजना पुर्णपणे ठप्प पडली आहे.लोकप्रतिनिधींची उदासिनतानिम्न चुलबंद प्रकल्पाचे काम मागील १५ वर्षांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरलेला हा प्रकल्प लवकर पुर्ण होईल, शेतीला सिंचनाची सोय होईल, या आशेवर शेतकरी असला तरी दिवास्वप्न ठरलेल्या या प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम कासवगतीने होत आहे.