शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सदर योजनेत काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केला. ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी देऊन टॅक्स वसुली करीत नागरिकांना नवीन नळाची जोडणी करून दिली.

ठळक मुद्देचिचाळ येथे पाण्यासाठी बोंब : जुनी नळयोजना झाली कालबाह्य

प्रकाश हातेल।लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : चिचाळ येथे पाणीपुरवठा करण्यात येणारी जुनी नळयोजना जीर्ण झाली आहे. परिणामी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले तरी निकृष्ट साहित्य वापराने योजना अपयशी ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर योजना अधांतरी असून गावात पाण्यासाठी बोंब सुरु आहे.विशेष म्हणजे या योजनेंतर्गत कंत्राटदाराला जलवाहिनी तात्काळ बदलवून सात दिवसात काम पूर्ण करण्याचे कळविण्यात आले आहे. अन्यथा आपल्यासोबत केलेला करारनामा रद्द करून नाव काळ्या यादीत घातले जाईल, असेही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.सदर योजनेत काम करताना कंत्राटदाराने निकृष्ट साहित्याचा वापर केला. ग्रामपंचायतीनेही गावात दवंडी देऊन टॅक्स वसुली करीत नागरिकांना नवीन नळाची जोडणी करून दिली. मात्र पाणी वाहून नेणारी उर्ध्वनलिका वारंवार फुटत असल्याने नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. तांत्रिकदृष्ट्या योग्यरित्या जलवाहिनीला थातूरमातूर डागडुजी करून त्यावर काँक्रीट टाकण्यात आले. अशा स्थितीत जवळपास तीन महिने पाणीपुरवठा योजना चालविण्यात आली. याबाबत कंत्राटदाराला वारंवार सूचना देऊनही दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे.कृत्रिम पाणीटंचाईयाबाबत सदर कंत्राटदाराला वारंवार पत्रान्वये कळवूनही कुठलीच कारवाई न झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वापरण्यात आलेली जलवाहिनी बदलवून नवीन जलवाहिनी घालण्यात यावी, अशी बाबही पत्रात नमूद केली आहे.कंत्राटदाराने वापरलेली जलवाहिनी निकृष्ट दर्जाची असल्याने वारंवार पाण्याची गळती होत आहे. परिणामी गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिनी पूर्णपणे बदलविण्याची गरज आहे.-लोपमुद्रा वैरागडे, सरपंच, चिचाळ

टॅग्स :Waterपाणी