शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

प्रकल्पाचे पाणी शिरले शेतात

By admin | Updated: January 11, 2015 22:45 IST

गोसे प्रकल्पातील पाणी खापरी यथील शेतामध्ये शिरले आहे. त्यामुळे मिरचीचे बाग, कापूस, धानाचे पऱ्हे, चना, मुग आदी पिक पाण्याखाली आली आहेत. प्रशासाने याकडे लक्ष

पालोरा (चौ.) : गोसे प्रकल्पातील पाणी खापरी यथील शेतामध्ये शिरले आहे. त्यामुळे मिरचीचे बाग, कापूस, धानाचे पऱ्हे, चना, मुग आदी पिक पाण्याखाली आली आहेत. प्रशासाने याकडे लक्ष देवून गावाचे पुनर्वसन करावो व मोबदला देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.खापरी गाव जंगलाने व्यापलेला असल्यामुळे वन्य प्राण्याचा गावात व शेतात हैदोस सुरु आहे. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मागील महिन्यात शेतकऱ्यांनी शेतात विविध बागायती शेती व कठाण पीक शेतात पेरले होते. मिरचीचे पीक हातात आले होते. लक्षावधी रुपये खर्च करून शेतात पिक घेतले होते. एकीकडे वन्य प्राणी शेतमालाची नुकसान करीत आहेत तर दुसरीकडे गोसे प्रकल्पात पाणी अडविल्यामुळे संपूर्ण परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. पाणी अडविणार कुणीही पीक घेऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्व सूचना देण्यात आली नसल्यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथे रोजगाराची दुसरे साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मिरचीचे पीक पाण्याखाली आल्यामुळे मिरचीचा तोडा कसा करावा, कर्ज कसे फेडावे अशा विविध प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. गोसे प्रकल्प अंतर्गत जी शेती गेली आहे त्या शेतीचा प्रशासनाकडून अजून मोबदला सुद्धा मिळाला नाही. जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते. गावात रोजगार उरला नसल्यामुळे वन विभागाकडून जंगलात जाण्यास बंदी असताना सुद्धावितभर पोटाची खडगी भरण्याकरिता जंगलात जावून मोऱ्या आणून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. (वार्ताहर)