शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

भंडारा जिल्ह्यात २६ गावांचे जलस्रोत दूषित; दूषित पाण्याने चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:09 IST

Bhandara : ४४ पेक्षा अधिक जलस्रोत पेयजलासाठी अयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने ७६६ गावांपैकी ७५२ गावांतील जलस्रोतांची तपासणी केली असून, २६ गावांतील जलस्रोत दूषित, रासायनिकदृष्ट्वा अपायकारक किंवा जिवाणूयुक्त असल्याचे निष्पन्न झाले, जिल्ह्यातील ४४ पेक्षा तसेच जास्त जलस्रोत पेयजलासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले. या दूषित पाण्यामुळे डेंग्यू कॉलरा, हिपॅटायटिस, टायफॉइड यांसारखे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरवर्षी दोन वेळा एप्रिल ते जुलै आणि ऑक्टोबर ते मार्चमध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली आणि लाखांदूर येथील जिल्हा परिषद प्रयोगशाळांमध्ये जलस्रोतांची रासायनिक व जाते. यंदा एकूण ७४० गावांतील पाण्याची रासायनिक व ७५० गावांतील जिवाणू तपासणी करण्यात आली. यापैकी २६ गावांत पाणी आरोग्यासाठी धोका ठरले, तर ४४ जलस्रोत पूर्णपणे पेयजलासाठी अयोग्य ठरले.

जिल्ह्यातील वैनगंगा नदीचे पाणीही प्रदूषित असून यामुळे शहर व गावांमध्ये पाणीटंचाईचे समस्या वाढल्या आहेत. गोसेखुर्द प्रकल्पामधील जलवाहिन्यांचा व राज्य यंत्रणांचा अभाव यामुळे नदीप्रवाहाचा नुकसानीचा फटका स्थानिक लोकांना सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत जलस्रोतांची शुद्धता आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी जलसंधारण व स्वच्छता योजनेवर अधिक भर देणे अत्यावश्यक आहे.

जिल्हा प्रशासनाने दूषित जलस्रोतांतर त्वरित योग्य उपचार करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यदृष्ट्या स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळावे, या दिशेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या तपासणीतील निष्कर्ष नागरिकांसाठी आव्हान असून, प्रदूषित पाणी पिण्यापासून वंचित राहणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

उपाययोजनांची गरजदूरदृष्टीने जिल्ह्यातील गावांमध्ये शाश्वत जलसंधारण प्रकल्प राबविणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डे खोदणे आणि जलशुद्धीकरण यंत्रणा सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे, जेणेकरून जलदूषिततेचा परिणाम कमी करता येईल आणि गावातील पाण्याचा दर्जा सुधारता येईल, अशा उपाययोजनांनीच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याची गुणवत्ता सुधारून लोकसंविधानसंबंधी आरोग्याच्या संकटांपासून मुक्तता मिळणे शक्य होणार आहे.

"भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी वर्षातून दोनवेळा जलस्रोतांची तपासणी केली जाते. ब्लीचिंग पावडर, फिटकरीचा वापर करून शुद्धीकरण केले जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा जलतपासणी करून पाणी वापरण्यास योग्य आहे का, हे निश्चित केले जाते. पावसाळ्यानंतर जलस्रोतांमध्ये बदल होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे पुन्हा तपासणी मोहीम राबवण्यात येईल. त्यासाठी यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या जातील."- माणिक चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईbhandara-acभंडारा