शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पाणीटंचाईच्या उपाययोजना झाल्या प्रभावहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:28 IST

तलावाच्या जिल्ह्यात कधी नव्हे ते यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून जलस्रोत आटले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा मंजूर केला. मात्र या आराखड्यातील उपाययोजना प्रभावहीन दिसत आहेत.

ठळक मुद्देगावागावांत पाणीटंचाई : कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक हैराण, कृती आराखड्यातील उपाययोजनांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावाच्या जिल्ह्यात कधी नव्हे ते यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून जलस्रोत आटले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा मंजूर केला. मात्र या आराखड्यातील उपाययोजना प्रभावहीन दिसत आहेत. त्यामुळे पहाटेपासूनच माय माऊल्यांना डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन भटकंती करावी लागत आहे.भंडारा जिल्ह्यात तेराशेच्या वर तलाव आणि विस्तीर्ण पात्र असलेल्या नद्या आहेत. असे असतानाही यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला. ६७९ गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. १५५५ उपाययोजनांसाठी १२ कोटी ५८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात नवीन विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विहिर खोलीकरण व गाळ काढण्याचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ विंधन विहिरी खोदण्यावरच खर्च करण्यात आला. इतर योजनांकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गावागावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील जलस्त्रोत तळाला गेले आहेत. नदीचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. हातपंपाला तासन्तास हापसल्यानंतर कळशीभर पाणी मिळते. त्यामुळे अनेकांना रोज मजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रकल्पाचे पाणी सोडण्याची प्रतीक्षाजिल्ह्यात मोठे आणि मध्यम प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मे महिन्यात या प्रकल्पाचे पाणी सोडले जाणार असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु अद्यापर्यंत प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडले नाही. पेंच, बावनथडी, इडियाडोह या प्रकल्पातून पाणी सोडले जाणार होते. परंतु अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. या प्रकल्पाचे पाणी सोडल्यास नदी तीरावरील गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि त्यातून पाणीटंचाई संपुष्टात येईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई