शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

‘त्या’ १५ गावातील पाण्याचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना वजा मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी १५ दिवसांअगोदर केली होती. मात्र त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्याने शेतकऱ्यांवर कोरोना सह पाण्याचे दुबार संकट आले आहे

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर दुबार संकट : बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची गरज

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : उन्हाची तीव्र दाहकता वाढल्याने जलस्तर खोलात गेला तालुक्यातील विहरी तलाव पूर्णत: आटले व बोरवेल सुद्धा बंद पडले आहेत. विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना वजा मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी १५ दिवसांअगोदर केली होती. मात्र त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्याने शेतकऱ्यांवर कोरोना सह पाण्याचे दुबार संकट आले आहेतुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठण ठणात आहे त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंडया वारपिंडकेपार, महालगाव या गावामध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहेलॉकडाऊनमुळे मजुराअभावी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी होतांना शेतकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांनी नव्या उमेदने उन्हाळी हंगामात ऊस व धानपिक शेतात लावले परंतु विहारी तलाव बोअरवेल आटल्याने त्या उभ्या पिकांना कसे वाचविता येईल. या विवंचनेत शेतकरी सापडला आहे दरम्यान आ राजू कारेमोरे यांच्या कडे शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली असता कारेमोरे यांनी जिल्हाधिकारी यांना बावनथडी प्रकल्पाचे नदीत पाणी सोडण्यासंदर्भात ६ मे रोजी पत्र दिले आहे मात्र त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.पिकांना फटकानिर्सगावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्री चा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात मात्र उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी तलाव तळ गाठत आहे. त्यावर शेती फिडरच्या भारनियमन मुळे शेतकऱ्यांचा उभ्या पिकांना फटका बसला आहे कोविड -१९ कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी देशाला लॉक डाऊन करण्यात आल्याने सर्व जागच्या जागी थांबले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात