शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

कालव्यातील पाणी गळतीने वैरण सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

  तुलसीदास रावते   लोकमत न्यूज नेटवर्क पवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याला गळती लागली असून शेकडाे एकरात पाणी साचले आहे. ...

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : शेकडाे एकरात पाणीच पाणी

  तुलसीदास रावते  लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याला गळती लागली असून शेकडाे एकरात पाणी साचले आहे. शेतात असलेले वैरण या पाण्याने सडले असून आता जनावरांना चारा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उन्हाळी धानासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आंदाेलनाच्या प्रवित्र्यात आहे. आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्यावर माेठ्या प्रमाणात सिंचन केले जाते. परंतु गत दाेन महिन्यांपासून कालव्याच्या मुख्य गेटला गळती लागली आहे. हजाराे लिटर पाणी कालव्यातून वाहून जात आहे. कालव्यातील हे पाणी पाटसऱ्यांच्या माध्यमातून शेतात शिरत आहे. शेतात सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. विशेष म्हणजे धानाची मळणी झाल्यानंतर माेठ्या प्रमाणात वैरण शेतातच हाेते. या पाण्याने तणसाचे ढिग सडले आहे. अशा परिस्थतीत वर्षभर जनावरांचा चारा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी धानाचे कडपा ओले झाल्याने शेतकऱ्यांना माेठा फटका बसला हाेता. आधीच निसर्गाच्या दृष्टचक्राने शेतकरी हतबल झाला आहे. मात्र बावनथडी प्रकल्पाचे अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी कृष्णकुमार रहांगडाले म्हणाले, आधी धानकडपा आणि आता तणस ओले हाेत आहे. वर्षभर जनावरांचा चारा कसा पुरवायचा असा प्रश्न असल्याचे सांगितले. बावनथडी प्रकल्पाच्या भाेंगळ कारभाराने शेतकरी त्रस्त झाल्याचे सरपंच प्रतिमा अशाेक ठाकूर यांनी सांगितले. २४ डिसेंबरला  बघेडा येथे आंदाेलन एकीकडे पाण्याचा अपव्यय हाेत असताना कारली वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी धानासाठी पाणी मिळत नाही. बावनथडीचे पाणी सिंचनासाठी साेडले नाही तर २४ डिसेंबर राेजी बघेडा येथे आंदाेलन करण्याचा इशारा सरपंच प्रतिमा ठाकूर, उपसरपंच गाेपीचंद गायकवाड, सदन चाैधरी, कृष्णकुमार रहांगडाले, रतनलाल पारधी, दिनदयाल बिसने यांनी दिला आहे.

पाण्याचा अपव्ययगत दोन महिन्यांपासून कालव्याच्या मुख्य गेटमधून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत असून दुसरीकडे शेतकरी सिंचनासाठी पाणी मागत आहेत. मात्र त्यांना सिंचनासाठी पाणी सोडले जात नाही. प्रकल्प प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे एकीकडे शेतकरी पाण्यासाठी आंदोलनाची भूमीका घेत आहेत तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पagricultureशेती