शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

कालव्यातील पाणी गळतीने वैरण सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

  तुलसीदास रावते   लोकमत न्यूज नेटवर्क पवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याला गळती लागली असून शेकडाे एकरात पाणी साचले आहे. ...

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : शेकडाे एकरात पाणीच पाणी

  तुलसीदास रावते  लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याला गळती लागली असून शेकडाे एकरात पाणी साचले आहे. शेतात असलेले वैरण या पाण्याने सडले असून आता जनावरांना चारा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उन्हाळी धानासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आंदाेलनाच्या प्रवित्र्यात आहे. आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्यावर माेठ्या प्रमाणात सिंचन केले जाते. परंतु गत दाेन महिन्यांपासून कालव्याच्या मुख्य गेटला गळती लागली आहे. हजाराे लिटर पाणी कालव्यातून वाहून जात आहे. कालव्यातील हे पाणी पाटसऱ्यांच्या माध्यमातून शेतात शिरत आहे. शेतात सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. विशेष म्हणजे धानाची मळणी झाल्यानंतर माेठ्या प्रमाणात वैरण शेतातच हाेते. या पाण्याने तणसाचे ढिग सडले आहे. अशा परिस्थतीत वर्षभर जनावरांचा चारा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी धानाचे कडपा ओले झाल्याने शेतकऱ्यांना माेठा फटका बसला हाेता. आधीच निसर्गाच्या दृष्टचक्राने शेतकरी हतबल झाला आहे. मात्र बावनथडी प्रकल्पाचे अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी कृष्णकुमार रहांगडाले म्हणाले, आधी धानकडपा आणि आता तणस ओले हाेत आहे. वर्षभर जनावरांचा चारा कसा पुरवायचा असा प्रश्न असल्याचे सांगितले. बावनथडी प्रकल्पाच्या भाेंगळ कारभाराने शेतकरी त्रस्त झाल्याचे सरपंच प्रतिमा अशाेक ठाकूर यांनी सांगितले. २४ डिसेंबरला  बघेडा येथे आंदाेलन एकीकडे पाण्याचा अपव्यय हाेत असताना कारली वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी धानासाठी पाणी मिळत नाही. बावनथडीचे पाणी सिंचनासाठी साेडले नाही तर २४ डिसेंबर राेजी बघेडा येथे आंदाेलन करण्याचा इशारा सरपंच प्रतिमा ठाकूर, उपसरपंच गाेपीचंद गायकवाड, सदन चाैधरी, कृष्णकुमार रहांगडाले, रतनलाल पारधी, दिनदयाल बिसने यांनी दिला आहे.

पाण्याचा अपव्ययगत दोन महिन्यांपासून कालव्याच्या मुख्य गेटमधून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत असून दुसरीकडे शेतकरी सिंचनासाठी पाणी मागत आहेत. मात्र त्यांना सिंचनासाठी पाणी सोडले जात नाही. प्रकल्प प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे एकीकडे शेतकरी पाण्यासाठी आंदोलनाची भूमीका घेत आहेत तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पagricultureशेती