शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा धोक्याच्या पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:50 IST

आठ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपावसाची उसंत : गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडले, पुजारीटोला आणि धापेवाडा प्रकल्पातून विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात संजय सरोवर, पुजारीटोला, कालीसराड व इडियाडोह या धरणामुळे पूर परिस्थिती निर्माण होवू शकते. धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा शहरानजीक कारधा येथे शुक्रवारी दुपारी ४ वाजता वैनगंगा नऊ मीटर या इशारा पातळीवरून वाहत होती. रात्रीतून या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून कारधा येथे वैनगंगेची धोका पातळी ९.५ मीटर आहे.जिल्ह्यात नदीकाठावर १५४ गावे आहेत. या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान १३३० मीमी असून आतापर्यंत जिल्ह्यात ६३६.८ मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती प्राधीकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे.दरम्यान पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे १७ दरवाजे एक मीटरने तर १६ दरवाजे अर्धा मीटरने सायंकाळी ५ वाजता उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून सहा हजार ९४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ११४६.०८ दलघमी असून उपयुक्त जलसाठा क्षमता ७४०.१७ दलघमी आहे. शुक्रवारी या जलाशयाची पातळी २४२.८५० मीटर मोजण्यात आली. तर उपयुक्त पाणीसाठा २६२.४६ दलघमी आहे.आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत होता. शुक्रवारी या पावसाने उसंत घेतली. मोहाडी तालुक्याकडे मात्र वरूणराजाची वक्रदृष्टी दिसत आहे. येथे दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. अनेकांच्या शेतात रोवणीसाठीसुद्धा पाणी नाही. भंडारा तालुक्यातील मोहदुरा, खुर्शीपार पुलावर पुराचे सावट असून हा मार्ग काहीकाळ बंद होता.

टॅग्स :riverनदी