शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

शेतकऱ्यांची मजुरांसाठी भटकंती

By admin | Updated: March 27, 2015 00:21 IST

पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी ..

पालोरा (चौ.) : पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला मागे टाकून सागवन जळीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. यात एक हजार जळीमागे एका मजुराला १५० रुपये मिळत आहेत. एका दिवशी एक मजूर ७ ते ८ हजार जळी काढतो. त्यामागे त्याला ८ ते ९ रुपये मिळत असल्यामुळे ही सागवन जळी मजुरांसाठी वरदान ठरत आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे मजुरांअभावी शेतकऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.धान्याचे कोठार म्हणून पवनी तालुका प्रसिद्ध आहे. वर्षातून तीन वेळा शेतातून उत्पन्न घेतले जाते. पाण्याचा स्त्रोत जास्त प्रमाणात असल्यामुळे उन्हाळी धान पिकाचे उत्पन्न बऱ्याच प्रमाणात घेतले जाते. मात्र धान पिकाला लागणारी जास्त प्रमाणात मेहनत, वाढता खर्च, पिकाला अल्प भाव मिळत नसल्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त झालेला होता. दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला मागे टाकून उसाचे उत्पादन घेणे सुरु केले आहे. मात्र वाढत्या महागाईने मिळणाऱ्या मजुरीने मजुरांना आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणे कठीण झाले होते. येथील डॉ.अमन भांडारकर यांनी मागील दहा वर्षापूर्वी आपल्या शेतात सागवन जळीचे पिक घेतले होते. या पिकामुळे खर्च कमी उत्पादन जास्त लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी जळीचे पिक घेणे सुरु केले. आज जवळपास शेकडो एकर शेतीमध्ये सागवन जळीचे उत्पादन घेणे सुरु आहे. यात शेतकऱ्यांसोबतच मजुरांना चांगलाच रोजगार मिळाला आहे. गावातील बऱ्याच प्रमाणातील मजूर वर्ग सागवन जळी खोदण्याच्या कामावर जात आहेत. या कामात मजूरी चांगल्या प्रमाणे मिळत असल्यामुळे मजूर वर्ग शेतकऱ्यांचा शेतात काम करण्यास जायला कंटाळत आहेत. कुटुंबाला काम मिळत असल्यामुळे गावात मजूर मिळणे कठीण झाले आहे. मात्र मजूर वर्गात आनंद पाहायला मिळत आहे. दोन महिन्यात एक कुटुंब २० ते ३० हजार रुपयाचे काम करतो. अल्प मेहनत जास्त पैसे मिळत असल्यामुळे मजुरांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे. (वार्ताहर)