शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची मजुरांसाठी भटकंती

By admin | Updated: March 27, 2015 00:21 IST

पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी ..

पालोरा (चौ.) : पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला मागे टाकून सागवन जळीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. यात एक हजार जळीमागे एका मजुराला १५० रुपये मिळत आहेत. एका दिवशी एक मजूर ७ ते ८ हजार जळी काढतो. त्यामागे त्याला ८ ते ९ रुपये मिळत असल्यामुळे ही सागवन जळी मजुरांसाठी वरदान ठरत आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे मजुरांअभावी शेतकऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.धान्याचे कोठार म्हणून पवनी तालुका प्रसिद्ध आहे. वर्षातून तीन वेळा शेतातून उत्पन्न घेतले जाते. पाण्याचा स्त्रोत जास्त प्रमाणात असल्यामुळे उन्हाळी धान पिकाचे उत्पन्न बऱ्याच प्रमाणात घेतले जाते. मात्र धान पिकाला लागणारी जास्त प्रमाणात मेहनत, वाढता खर्च, पिकाला अल्प भाव मिळत नसल्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त झालेला होता. दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला मागे टाकून उसाचे उत्पादन घेणे सुरु केले आहे. मात्र वाढत्या महागाईने मिळणाऱ्या मजुरीने मजुरांना आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणे कठीण झाले होते. येथील डॉ.अमन भांडारकर यांनी मागील दहा वर्षापूर्वी आपल्या शेतात सागवन जळीचे पिक घेतले होते. या पिकामुळे खर्च कमी उत्पादन जास्त लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी जळीचे पिक घेणे सुरु केले. आज जवळपास शेकडो एकर शेतीमध्ये सागवन जळीचे उत्पादन घेणे सुरु आहे. यात शेतकऱ्यांसोबतच मजुरांना चांगलाच रोजगार मिळाला आहे. गावातील बऱ्याच प्रमाणातील मजूर वर्ग सागवन जळी खोदण्याच्या कामावर जात आहेत. या कामात मजूरी चांगल्या प्रमाणे मिळत असल्यामुळे मजूर वर्ग शेतकऱ्यांचा शेतात काम करण्यास जायला कंटाळत आहेत. कुटुंबाला काम मिळत असल्यामुळे गावात मजूर मिळणे कठीण झाले आहे. मात्र मजूर वर्गात आनंद पाहायला मिळत आहे. दोन महिन्यात एक कुटुंब २० ते ३० हजार रुपयाचे काम करतो. अल्प मेहनत जास्त पैसे मिळत असल्यामुळे मजुरांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे. (वार्ताहर)