लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दोन वर्षापासून सालेबर्डी पुनर्वसन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार लेखी माहिती देऊ नही या गावाकडे गोसेखुर्द विभाग व संबंधित यंत्रणा कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात हरीतक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पाअंतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही शासन-प्रशासन दरबारी धुळखात परिस्थितीमध्ये आहेत. भंडारा तालुक्यातील सालेबर्डी (पांधी) हे गाव गोसेखुर्द प्रकल्पात संपादित करुन या गावाचे नियोजित पुनर्वसन पर्यायी गावठाण शहापूर (मारेगांव) या ठिकाणी आहे. पुनर्वसन नागरी सुविधेची कामे अंतिम टप्प्यात असून, प्रत्यक्ष ताबा मिळणे बाकी आहे.सालेबर्डी (पांधी) चे नवीन पुनर्वसन पर्यायी गावठाण शहापूर (मारेगांव) या ठिकाणी सदर प्रकल्पग्रस्तांना भूखंड व पट्टे देण्यात आले आहे. सदर ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या मिळालेल्या भूखंडावर बळजबरीने अतिक्रमण करुन, प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडावर डल्ला मारण्याचे काम सदर ठिकाणी दिसून येत आहे. मात्र विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सालेबर्डी पुनर्वसनाला लागनूच पिपरी पुनर्वसन आहे.पिपरी पुनर्वसन गावातील प्रकल्पग्रस्तांनी सदर प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या भूखंडावर बळजबरीने शौचालय व पक्के इमारतीचे बांधकाम करण्यात आले. यासंबधी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन वर्षापासून गोसेखुर्द विभाग व संबंधित यंत्रणेकडे लेखी माहिती देवून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष खदखदत आहे.विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे दुर्लक्षपुनर्वसन पर्यायी गावठाण शहापूर या ठिकाणी बळजबरीने बाहेरच्या व्यक्तींनी अतिक्रमण केल्यामुळे गत दोन वर्षापासून ग्रामपंचायतने गोसेखुर्द विभागाकडे लेखी निवेदन दिले होते. मात्र या गंभीर समस्येकडे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
सालेबर्डी पुनर्वसन अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST