शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळवासी तालुक्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: September 8, 2015 00:32 IST

ब्रिटिशकाळात भंडारा जिल्ह्यात तीनच तालुके होते. यात भंडारा, साकोली, गोंदियाचा समावेश होता

निवेदन खितपत पडून : शासनाकडून अपेक्षाविशाल रणदिवे  अड्याळब्रिटिशकाळात भंडारा जिल्ह्यात तीनच तालुके होते. यात भंडारा, साकोली, गोंदियाचा समावेश होता. साकोली तालुक्यातील लाखनी व गोंदिया तालुक्यातील तिरोडा येथे सिनीयर बेसीक शाळा तेव्हा अड्याळमध्येसुध्दा त्या काळात ही शाळा होती. लाखनी तसेच तिरोडा यांना तालुका घोषीत केले आणि अड्याळला वगळण्यात आले. पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी मागील २५ वर्षांपासुन मागणी आहे. गावपातळीवर शासकीय कामे एकाच ठिकाणी करता यावे, त्यापासून जनतेचा विकास साध्य करता यावा या हेतुने राज्य शासनाने केंद्रस्थानी असलेल्या गावाला महत्व देणे गरजेचे आहे. अड्याळ हे गाव पवनी तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या जवळपास २० हजार असून निवडणुकीला १० बुथ राहतात. बसस्थानक, पोलीस ठाणे, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, दुरभाष केंद्र, डाक घर, ग्रामीण रुग्णालय, नायब तहसील कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, शाळा महाविद्यालय, संगणक प्रशिक्षण केंद्र यासह अन्य कार्यालये आहेत. निवडणुका आटोपताच लोकप्रतिनिधी म्हणून भरगच्च मतांनी निवडूनही आले; परंतु अड्याळला यायला वेळ नाही. हनुमान जयंतीचा उत्सव, रामनवमीला विवाह सोहळ्याला उशिरा का होईना भेट दिली. थोडा वेळ चर्चा म्हणून बैठक त्यातही शेकडो ग्रामस्थ व त्यापैकी एकाने ‘भाऊ आपला अड्याळ तालुका’ होईल का? उत्तर मिळाले, कृती समिती स्थापन करा, जमेलच तर एखादी मोर्चा काढा, असे सांगण्यात आले. निवडणुकां आधी याच अड्याळ गावातील मंचकावर ग्रामस्थांनी अनेकदा नेत्यांना तालुका निर्मिती करावी, म्हणून निवेदनही दिले. लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात रॅलीमध्ये अड्याळ तालुका नक्कीच होणार असे म्हणणारे आज फार क्वचित दिसतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा अमुक कार्यक्रमाचे आयोजन केल्यासारखे आणि अड्याळ गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून निवेदन दिले जाईल. विषय एकच असतो बदल असतो मात्र देण्याऱ्यांच्या नावात आलेला असतो. एखादा उत्सव त्याचे अध्यक्षपद जसे बदलतात त्याप्रमाणे परंतु यानंतर अड्याळ तालुका झालाच पाहिजे, अशी ठिणगी पडलेली दिसते. यासाठी शिवसेनेचे संजु ब्राम्हणकर, राजु मुरकूटे यांनी शकडो ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा एकदा अड्याळ तालुका व्हावे म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. नुसते निवेदन दिल्याने तालुका होईल का? असे झाले तर आधी दिलेल्या शेकडो निवेदनांचे काय झाले? असा सवाल खितपत पडून आहे. माहितीनुसार महाराष्ट्रात नवीन तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त, महसुल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. भंडारा जिल्हयातील अड्याळ तालुका होण्यासाठी निवडणुक काळात मोठमोठी आश्वासन दिली होती. त्यामुळे नविन तालुका निर्मिती यादीत आपला नंबर आहे की नाही हे सांगणार कोण? एका जिल्हा निर्मितीसाठी ३५० कोटी रुपये खर्च येतो अशी माहिती आहे. त्याचप्रमाणे अड्याळ तालुक्याच्या तपशिलात अंदाजे २० कोटी रुपये खर्च सांगितला आहे. सर्व सुविधायुक्त होण्यासाठी हा किमान खर्च आहे. दर्जा मिळावा यासाठी गाव व परिसरातील जनतेत उत्साह आहे. परंतु शासनाला हा उत्साह, निवेदन दिसणार कधी, असा सावाल आहे.अड्याळला नायब तहसील कार्यालय आहेत. परंतु ते साहेब ठरलेल्या दिवशी मिळणारच याची शास्वती नाही. त्यामुळे इथे येणा-या ग्रामीण भागातील लोकांना पवनीला जावे लागते. आतातरी आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी अड्याळ ग्रमावासींयाकडून होत आहे.