शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

अड्याळवासी तालुक्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: September 8, 2015 00:32 IST

ब्रिटिशकाळात भंडारा जिल्ह्यात तीनच तालुके होते. यात भंडारा, साकोली, गोंदियाचा समावेश होता

निवेदन खितपत पडून : शासनाकडून अपेक्षाविशाल रणदिवे  अड्याळब्रिटिशकाळात भंडारा जिल्ह्यात तीनच तालुके होते. यात भंडारा, साकोली, गोंदियाचा समावेश होता. साकोली तालुक्यातील लाखनी व गोंदिया तालुक्यातील तिरोडा येथे सिनीयर बेसीक शाळा तेव्हा अड्याळमध्येसुध्दा त्या काळात ही शाळा होती. लाखनी तसेच तिरोडा यांना तालुका घोषीत केले आणि अड्याळला वगळण्यात आले. पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी मागील २५ वर्षांपासुन मागणी आहे. गावपातळीवर शासकीय कामे एकाच ठिकाणी करता यावे, त्यापासून जनतेचा विकास साध्य करता यावा या हेतुने राज्य शासनाने केंद्रस्थानी असलेल्या गावाला महत्व देणे गरजेचे आहे. अड्याळ हे गाव पवनी तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या जवळपास २० हजार असून निवडणुकीला १० बुथ राहतात. बसस्थानक, पोलीस ठाणे, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, दुरभाष केंद्र, डाक घर, ग्रामीण रुग्णालय, नायब तहसील कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, शाळा महाविद्यालय, संगणक प्रशिक्षण केंद्र यासह अन्य कार्यालये आहेत. निवडणुका आटोपताच लोकप्रतिनिधी म्हणून भरगच्च मतांनी निवडूनही आले; परंतु अड्याळला यायला वेळ नाही. हनुमान जयंतीचा उत्सव, रामनवमीला विवाह सोहळ्याला उशिरा का होईना भेट दिली. थोडा वेळ चर्चा म्हणून बैठक त्यातही शेकडो ग्रामस्थ व त्यापैकी एकाने ‘भाऊ आपला अड्याळ तालुका’ होईल का? उत्तर मिळाले, कृती समिती स्थापन करा, जमेलच तर एखादी मोर्चा काढा, असे सांगण्यात आले. निवडणुकां आधी याच अड्याळ गावातील मंचकावर ग्रामस्थांनी अनेकदा नेत्यांना तालुका निर्मिती करावी, म्हणून निवेदनही दिले. लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात रॅलीमध्ये अड्याळ तालुका नक्कीच होणार असे म्हणणारे आज फार क्वचित दिसतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा अमुक कार्यक्रमाचे आयोजन केल्यासारखे आणि अड्याळ गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून निवेदन दिले जाईल. विषय एकच असतो बदल असतो मात्र देण्याऱ्यांच्या नावात आलेला असतो. एखादा उत्सव त्याचे अध्यक्षपद जसे बदलतात त्याप्रमाणे परंतु यानंतर अड्याळ तालुका झालाच पाहिजे, अशी ठिणगी पडलेली दिसते. यासाठी शिवसेनेचे संजु ब्राम्हणकर, राजु मुरकूटे यांनी शकडो ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा एकदा अड्याळ तालुका व्हावे म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. नुसते निवेदन दिल्याने तालुका होईल का? असे झाले तर आधी दिलेल्या शेकडो निवेदनांचे काय झाले? असा सवाल खितपत पडून आहे. माहितीनुसार महाराष्ट्रात नवीन तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त, महसुल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. भंडारा जिल्हयातील अड्याळ तालुका होण्यासाठी निवडणुक काळात मोठमोठी आश्वासन दिली होती. त्यामुळे नविन तालुका निर्मिती यादीत आपला नंबर आहे की नाही हे सांगणार कोण? एका जिल्हा निर्मितीसाठी ३५० कोटी रुपये खर्च येतो अशी माहिती आहे. त्याचप्रमाणे अड्याळ तालुक्याच्या तपशिलात अंदाजे २० कोटी रुपये खर्च सांगितला आहे. सर्व सुविधायुक्त होण्यासाठी हा किमान खर्च आहे. दर्जा मिळावा यासाठी गाव व परिसरातील जनतेत उत्साह आहे. परंतु शासनाला हा उत्साह, निवेदन दिसणार कधी, असा सावाल आहे.अड्याळला नायब तहसील कार्यालय आहेत. परंतु ते साहेब ठरलेल्या दिवशी मिळणारच याची शास्वती नाही. त्यामुळे इथे येणा-या ग्रामीण भागातील लोकांना पवनीला जावे लागते. आतातरी आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी अड्याळ ग्रमावासींयाकडून होत आहे.