शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 12, 2016 00:14 IST

मागील काही वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देणारा पाऊस यावर्षी समाधानकारक बरसणार,

नजरा आकाशाकडे : १.८१ लाख हेक्टरवर होणार धान लागवडभंडारा : मागील काही वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देणारा पाऊस यावर्षी समाधानकारक बरसणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे. जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले असून पाऊस बरसणार, असा अंदाज बांधत बळीराजा पेरता झाला आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांची धूळ पेरणी आटोपली आहे. हुलकावणी देणाऱ्या पावसाने नेहमीच हवामान खात्याचा अंदाज चुकविला आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २०१६-१७ साठी खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यात धान, सोयाबीन, तूर, भुईमुंग, मूग, उडीद, तीळ या पिकांसाठी एकूण १ लाख ९० हजार हेक्टर शेतजमिनीवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी १ लाख ८१ हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. मागीलवर्षी खरीप हंगामात १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. यंदा हे क्षेत्र १ हजार हेक्टरने वाढणार आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाच्या सरीही बरसल्या आहेत. ओलिताची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणीला सुरूवात केली आहे. भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी धान लागवडीसाठी ३३ हजार २०० क्विंटल बियाणांची मागणी केली असून १८ हजार ६७७ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. तुर ६५० क्विंटल मागणी आणि सोयाबिन ३८०० क्विंटलची मागणी आहे. याशिवाय ८९ हजार ८३५ मेट्रीक टन खताची मागणी असून त्यापैकी ७४ हजार ४०० मेट्रीक टन मंजूर असून १६ हजार ८०६ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. असे असतानाही दरवर्षी बियाणे आणि खत व किटकनाशकांचा कृत्रिम तुटवडा जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असतो. (नगर प्रतिनिधी) आता तपासणी पथकात शेतकरीहीबनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेत तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या भरारी पथकात दोन शेतकरी साक्षीदार म्हणून राहतील. यात दोषी कृषी केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.सहा दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस जिल्ह्यात ४८२ कृषी केंद्र असून १९० कृषी केंद्र, २०९ खते आणि १२७ किटकनाशकांच्या दुकानांची भरारी पथकाने तपासणी केली. यामध्ये ६ दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली असून दोषी आढळलेल्या कृषी केंद्रांना बियाणे व खते विक्री बंद करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. यावर्षीही तरी शेती पिकू दे, शेतकऱ्यांची आर्तभंडारा जिल्हा हा धानशेतीसाठी पोषक असला तरी मागील काही वर्षांपासून धान शेती ही बेभरवशाची झाली आहे. मागीलवर्षी मृगाचा पाऊस वेळेवर बरसला त्यानंतर पावसाने दडी मारली. तेव्हापासूनच शेतकऱ्यांना संकटाची चाहूल लागणे सुरू झाले होते. त्यानंतर पाऊस बरसला तर रोवणी झाली. त्यानंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. धान लोंबीत येण्याच्या काळात पावसाने दडी मारली. त्यातच किडीचा प्रकोप झाला. कृषी केंद्रात मागितलेले किडनाशक मिळत नव्हते. त्यांच्याकडे उपलब्ध कीडनाशकाने कीड संपली नाही. त्यामुळे यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी मागतील ते किटकनाशक देण्याचे निर्देश दिले आहेत.