शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 12, 2016 00:14 IST

मागील काही वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देणारा पाऊस यावर्षी समाधानकारक बरसणार,

नजरा आकाशाकडे : १.८१ लाख हेक्टरवर होणार धान लागवडभंडारा : मागील काही वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देणारा पाऊस यावर्षी समाधानकारक बरसणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे. जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले असून पाऊस बरसणार, असा अंदाज बांधत बळीराजा पेरता झाला आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांची धूळ पेरणी आटोपली आहे. हुलकावणी देणाऱ्या पावसाने नेहमीच हवामान खात्याचा अंदाज चुकविला आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २०१६-१७ साठी खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यात धान, सोयाबीन, तूर, भुईमुंग, मूग, उडीद, तीळ या पिकांसाठी एकूण १ लाख ९० हजार हेक्टर शेतजमिनीवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी १ लाख ८१ हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. मागीलवर्षी खरीप हंगामात १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. यंदा हे क्षेत्र १ हजार हेक्टरने वाढणार आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाच्या सरीही बरसल्या आहेत. ओलिताची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणीला सुरूवात केली आहे. भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी धान लागवडीसाठी ३३ हजार २०० क्विंटल बियाणांची मागणी केली असून १८ हजार ६७७ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. तुर ६५० क्विंटल मागणी आणि सोयाबिन ३८०० क्विंटलची मागणी आहे. याशिवाय ८९ हजार ८३५ मेट्रीक टन खताची मागणी असून त्यापैकी ७४ हजार ४०० मेट्रीक टन मंजूर असून १६ हजार ८०६ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. असे असतानाही दरवर्षी बियाणे आणि खत व किटकनाशकांचा कृत्रिम तुटवडा जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असतो. (नगर प्रतिनिधी) आता तपासणी पथकात शेतकरीहीबनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेत तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या भरारी पथकात दोन शेतकरी साक्षीदार म्हणून राहतील. यात दोषी कृषी केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.सहा दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस जिल्ह्यात ४८२ कृषी केंद्र असून १९० कृषी केंद्र, २०९ खते आणि १२७ किटकनाशकांच्या दुकानांची भरारी पथकाने तपासणी केली. यामध्ये ६ दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली असून दोषी आढळलेल्या कृषी केंद्रांना बियाणे व खते विक्री बंद करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. यावर्षीही तरी शेती पिकू दे, शेतकऱ्यांची आर्तभंडारा जिल्हा हा धानशेतीसाठी पोषक असला तरी मागील काही वर्षांपासून धान शेती ही बेभरवशाची झाली आहे. मागीलवर्षी मृगाचा पाऊस वेळेवर बरसला त्यानंतर पावसाने दडी मारली. तेव्हापासूनच शेतकऱ्यांना संकटाची चाहूल लागणे सुरू झाले होते. त्यानंतर पाऊस बरसला तर रोवणी झाली. त्यानंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. धान लोंबीत येण्याच्या काळात पावसाने दडी मारली. त्यातच किडीचा प्रकोप झाला. कृषी केंद्रात मागितलेले किडनाशक मिळत नव्हते. त्यांच्याकडे उपलब्ध कीडनाशकाने कीड संपली नाही. त्यामुळे यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी मागतील ते किटकनाशक देण्याचे निर्देश दिले आहेत.