शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

वैनगंगा, चुलबंद, बावनथडी नदीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात पूर्वी ९० पेक्षा अधिक रेतीघाट होते. परंतु गोसे प्रकल्पामुळे घाटांची संख्या कमी झाली. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव १४ महिन्यांपासून झाला नाही. दुसरीकडे वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. शासनाच्या महसुलाला चूना लागत आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा घाटाची पाहणी केली, तेव्हा ठिकठिकाणी रेती उपसाचे खड्डे आणि तिरावर रेतीचे ढिग दिसून आले. दिवसा ढवळ्या रेती जेसीबीने भरून नेली जात असल्याचे चित्र दिसत होते.

ठळक मुद्देलिलाव नसताना उपसा : रेती वाहतुकीसाठी नदीची नैसर्गिक संरक्षक भींत थडी पोखरली

भंडारा : रेती तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या घाटांवर लिलाव नसतानाही बेसुमार उपसा सुरू आहे. मशिनच्या अहोरात्र उत्खनन केले जात असल्याने जिल्ह्यातील वैनगंगा, चुलबंद, सूर, बावनथडी नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी नदीपात्रात मोठाले खड्डे तयार झाले असून वाहतूक सुलभ व्हावी यासाठी नदीची नैसर्गिक भींत थडी खचविण्याचे प्रकार सुरू आहे. यामुळे पर्यावरणासोबतच नदी तिरावरील गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.भंडारा जिल्ह्यात पूर्वी ९० पेक्षा अधिक रेतीघाट होते. परंतु गोसे प्रकल्पामुळे घाटांची संख्या कमी झाली. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव १४ महिन्यांपासून झाला नाही. दुसरीकडे वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. शासनाच्या महसुलाला चूना लागत आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा घाटाची पाहणी केली, तेव्हा ठिकठिकाणी रेती उपसाचे खड्डे आणि तिरावर रेतीचे ढिग दिसून आले. दिवसा ढवळ्या रेती जेसीबीने भरून नेली जात असल्याचे चित्र दिसत होते.

पात्र रूंदावल्याचा फटकारेतीचा उपसा होत असल्याने चुलबंद, सूर, बावनथडी नदीचे अनेक ठिकाणी पात्र विस्तारले आहे. चांदमारा, आष्टी, धुटेरा यासह गुडेगाव, धानोरी, एनोटा येथे नदीपात्र गावाकडे सरकत असल्याचे दिसत आहे. चुलबंद नदीचीही अशीच अवस्था आहे. वाहतूक सुलभ व्हावी म्हणून तस्कर रस्ता तयार करण्याच्या नादात नदीची थडी फोडून काढतात. त्यामुळे पुराचा धोका वाढत आहे.

दररोज होणारा वाळू उपसाबावनथडी नदीच्या चांदमारा, आष्टी, धुटेरा, सक्करदरा, वैनगंगा नदीच्या रोहा, बेटाळा, माडगी, ढोरवाडा, निलज, बाम्हणी, उमरवाडा, रेंगेपार यासह गुडेगाव, धानोरी, एनोडा, सिंदपूरी, मांगली आणि चुलबंद नदीच्या गवराळा, नांदेड, धर्मापुरी, इटान, अंतर्गाव घाटांवर मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. पर्यावरणवाद्यांनी अनेकदा आवाज उठविला. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.

निसर्गाची अनमोल देणगी लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. तस्करीमुळे नदी पात्राला पर्यायाने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ रेतीघाटांचे लिलाव करण्याची गरज आहे. तेव्हाच यावर पायबंद बसेल.- मो.सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञअध्यक्ष, ग्रीनहेरिटेज,भंडारा.

टॅग्स :riverनदी