शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अवैध व्यावसायिकांकडून ग्रामस्थांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:11 IST

अड्याळहून दोन किमी अंतरावर असलेल्या सौंदड, खापरी पुनर्वसन परिसरात मागील काही वर्षांपासून जनावरांना कत्तलखान्यात ट्रकांमध्ये नेले जात आहे.

ठळक मुद्देअड्याळ येथील घटना : सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी, घटनास्थळावरून पसार झालेले ट्रक व आरोपी मोकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळहून दोन किमी अंतरावर असलेल्या सौंदड, खापरी पुनर्वसन परिसरात मागील काही वर्षांपासून जनावरांना कत्तलखान्यात ट्रकांमध्ये नेले जात आहे. दरम्यान, शनिवारला सायंकाळी रस्त्यावर ट्रक आडवा करून त्यात जनावरे भरण्याचा प्रकार सुरू होता. दरम्यान, गुरे चराई करून घरी परतणाऱ्या एका गोपालकाने जनावरे भुजाडतात, थोडावेळ थांबा नंतर भरा, असे म्हणताच ट्रकमध्ये असणाºया लोकांनी या गोपालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे अड्याळ येथे वातावरण तापलेले आहे.अड्याळ पोलिसांनी २० ते २५ आरोपीपैकी शनिवारच्या रात्री १२ वाजता सात आरोपींना तर आज रविवारी चार जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये सहा प्रौढ तर एक अल्पवयीन आरोपी आहे. यात अज्जु शेख, प्रदिप नांगोलकर, सोहेल पठाण, सोयब शेख, जाहिर शेख, तौसिक शेख, चंद्रकांत डोंगरे सर्व रा.अड्याळ यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२४, ३२५, ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात गैरकायद्यांची मंडळी जमवुन लाठ्याकाठ्याने मारहाण करून दुखापत करणे, घरात घुसून महिलांची छेड काढणे, अशा विविध कलमा लावण्यात आले आहे.त्यानंतर २० ते ३० लोकांच्या समुहाने सौंदड पुर्नवसन येथील लोकांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढून मिळेल त्या साधनाने बेदम मारहाण केली.या मारहाणीत महिला व बालकेही जखमी झाले. त्यानंतर संतप्त सौंदड पुर्नवसनवासीयांनी याची तक्रार अड्याळ पोलीस ठाण्यात केली. याची माहिती घटनास्थळावरून अनेकांनी ठाणेदार यशवंत किचक यांना देऊनही पोलीस घटनास्थळांवर तातडीने पोहोचले नाही. पोलीस तातडीने गेले असते तर कत्तलखाण्यात जाणाºया गाई व आरोपीसुध्दा पोलिसांना सापडले असते.सौंदड खापरी (पुर्नवसन) येथे दर आठवड्याला १० ते १२ ट्रकमध्ये हजारो जनावरांना कत्तलखान्यात नेण्यात येते. यावर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अड्याळ पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करून नविन ठाणेदार व नविन पोलीस कर्मचारी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, स्थानिक गुन्हे शाखेचे आर.ए. मानकर, तुमसरचे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे अशा विविध चमू उपस्थित होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक रात्री ८ ते सकाळी ५ पर्यंत संपुर्ण चमूसह अड्याळ पोलीस ठाण्यात उपस्थित होते. अड्याळ येथे पोलिसांच्या तुकड्या आताही तैनात आहेत.अड्याळ ठाण्यावर ग्रामस्थांचा हल्लाबोलअड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयावह घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे पुर्नवसित ग्रामवासीय दहशतीत आहेत. घटना घडल्यानंतर दोन तसाने संपूर्ण सौंदडवासीय पुर्नवसन तथा अड्याळ ग्रामवासीयांनी पोलीस ठाण्यात रात्रीच तोबा गर्दी केली होती. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यात अनेकांच्या पाठीवर लाठीचे व्रण आहेत. मारहाणीत अनेक महिला जखमी झाल्या असून एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे.अवैध व्यवसाय बंद करा, अन्यथा आंदोलनअड्याळ शहर व परिसरात कुठलेही अवैध धंदे, सट्टापट्टी, मोहफुलाची दारू गाळणे, जनावरांची तस्करी बंद करणे आणि संपूर्ण आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी व कार्यरत बीट जमादाराविरूद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मागील अनेक वर्षांंपासून अड्याळ परिसरात अवैध व्यवसायांना ऊत आले होते. त्याचवेळी पोलिसांनी यावर प्रतिबंध घातला असता तर आज ही वेळ आली नस्ती, असे लोकांचे म्हणने आहे.सोमवारी अड्याळ बंदचे आवाहनजनावरांची कत्तलखान्यात तस्करी करणाऱ्या आरोपींनी निरपराध लोकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारला अड्याळ बंद पुकारण्यात आला आहे. आज सायंकाळीच सर्व पेट्रोलपंपवर सोमवारला बंदचे फलक लावण्यात आले आहे.सौंदड पुर्नवसन येथे घडलेल्या या गंभीर घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. यात सर्व दोषींविरूद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.- रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा