शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४५ गावातील धान पीकधोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:45 IST

सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देसिहोरा परिसरातील शेतकरी संकटात : चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. २५ जुलैपर्यंत पाण्याचा विसर्ग न केल्यास २६ जुलै रोजी चांदपूर जलाशयाचे गेट उघडण्यात येईल, असा इशारा राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रामदयाल पारधी यांनी दिला आहे.पावसाळा सुरू होऊन महिना लोटला. मागील २० दिवसांपासून पाऊस पडला नाही. सुरूवातीला आलेल्या पावसात शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली ती खार आता आली आहे. खार पिवळी पडली तर कुठे ती गळायला सुरवात झाली आहे. काहींनी रोवणी केली, तीव्र उष्णतेमुळे शेतात भेगा पडायला सुरूवात झाली आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावात शेतीकरिता चांदपूर जलाशयातील पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी जोर धरत आहे.अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाचा सामना सध्या करावा लागत आहे. चांदपूर जलाशयात सध्या २६.५४ टक्के पाणी साठा इतका आहे. जिवंत साठा २५ टक्के आहे. नियमानुसार येथे ३३ टक्के पाणीसाठा असेल तरच जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येते. परंतु किमान काही दिवस संपूर्ण धानाचे पीक वाचविण्याकरिता येथे पाण्याचा विसर्ग करण्याची गरज आहे.जिल्हा पाटबंधारे विभागाकडे मागणीस्थानिक पाटबंधारे विभागाने भंडारा येथील कार्यालयाकडे १९ जुलै रोजी चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता एका पत्राद्वारे मागणी केली आहे. परंतु अद्याप परवानगी मिळाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये येथे पाण्याचा विसर्ग करण्याची परवागनी मिळाल्यानंतरच चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. अद्याप येथे प्रतीक्षा करावी लागत आहे.राकाँने दिला अल्टिमेटमराकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रामदयाल पारधी यांनी चांदपूर जलाशयातून २५ जुलैपर्यंत पाण्याचा विसर्ग न केल्यास २६ जुलै रोजी स्थानिक शेतकऱ्यांसोबत चांदपूर जलाशयाचे गेट उघडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी नरेश गीते मंगळवारी रूजू झाले. त्यांनी सदर समस्येकडे गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता १९ जुलै रोजी भंडारा येथील मुख्य कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी रितसर प्राप्त होताच पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.-जे.आर. हटवार, उपविभागीय अभियंता, चांदपूर प्रकल्प तुमसर.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीकपात