शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

४५ गावातील धान पीकधोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:45 IST

सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देसिहोरा परिसरातील शेतकरी संकटात : चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. २५ जुलैपर्यंत पाण्याचा विसर्ग न केल्यास २६ जुलै रोजी चांदपूर जलाशयाचे गेट उघडण्यात येईल, असा इशारा राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रामदयाल पारधी यांनी दिला आहे.पावसाळा सुरू होऊन महिना लोटला. मागील २० दिवसांपासून पाऊस पडला नाही. सुरूवातीला आलेल्या पावसात शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली ती खार आता आली आहे. खार पिवळी पडली तर कुठे ती गळायला सुरवात झाली आहे. काहींनी रोवणी केली, तीव्र उष्णतेमुळे शेतात भेगा पडायला सुरूवात झाली आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावात शेतीकरिता चांदपूर जलाशयातील पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी जोर धरत आहे.अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाचा सामना सध्या करावा लागत आहे. चांदपूर जलाशयात सध्या २६.५४ टक्के पाणी साठा इतका आहे. जिवंत साठा २५ टक्के आहे. नियमानुसार येथे ३३ टक्के पाणीसाठा असेल तरच जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येते. परंतु किमान काही दिवस संपूर्ण धानाचे पीक वाचविण्याकरिता येथे पाण्याचा विसर्ग करण्याची गरज आहे.जिल्हा पाटबंधारे विभागाकडे मागणीस्थानिक पाटबंधारे विभागाने भंडारा येथील कार्यालयाकडे १९ जुलै रोजी चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता एका पत्राद्वारे मागणी केली आहे. परंतु अद्याप परवानगी मिळाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये येथे पाण्याचा विसर्ग करण्याची परवागनी मिळाल्यानंतरच चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. अद्याप येथे प्रतीक्षा करावी लागत आहे.राकाँने दिला अल्टिमेटमराकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रामदयाल पारधी यांनी चांदपूर जलाशयातून २५ जुलैपर्यंत पाण्याचा विसर्ग न केल्यास २६ जुलै रोजी स्थानिक शेतकऱ्यांसोबत चांदपूर जलाशयाचे गेट उघडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी नरेश गीते मंगळवारी रूजू झाले. त्यांनी सदर समस्येकडे गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता १९ जुलै रोजी भंडारा येथील मुख्य कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी रितसर प्राप्त होताच पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.-जे.आर. हटवार, उपविभागीय अभियंता, चांदपूर प्रकल्प तुमसर.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीकपात