शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
4
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
5
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
7
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
8
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
9
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
10
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
11
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
12
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
13
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
14
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
15
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
16
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
17
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
18
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
19
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
20
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?

भंडारा जिल्ह्यातल्या भाज्या निघाल्या सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 16:56 IST

भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे पाठबळ हरदोलीची भेंडी, मिरची दुबई-कतारला

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शेतकरी निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन घेण्याकडे वळत आहे.भंडारा जिल्हा म्हणजे भात उत्पादन असे समीकरण झाले आहे. मात्र अलीकडे भात शेती परवडत नसल्याने शेतकरी विविध प्रयोग करीत आहे. त्यातच गत काही वर्षात पालेभाज्या उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. गुणवत्तापुर्ण पालेभाज्यांना स्थानिक बाजारातच नव्हे तर परदेशातील बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील सेवकराम झंझाड यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला आता सातासमुद्रापार दुबई, कतार येथे निर्यात केला जात आहे.सेवकराम झंझाड यांच्याकडे सहा एकर शेती असून या शेतीत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांच्या मार्गदर्शनात त्यांनी नागपूर येथे ‘वनामती’मध्ये प्रशिक्षण घेतले. तेथून खऱ्या अर्थाने निर्यातक्षम पालेभाजा उत्पादनाला सुरवात झाली. निर्यातक्षम उत्पादन घेवून त्यांनी प्रगतीचा नवा मार्ग चोखाळला आहे. नागपूर येथील मित्राय फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला दुबई-कतार येथे निर्यात केला जात आहे. त्यातून त्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक नफा मिळत आहे. भेंडीला स्थानिक बाजारात १५ ते १६ रुपये किलो दर मिळतो. तोच आता निर्यातीमुळे २४ रुपये किलो मिळत आहे. मिरचीतही त्यांना चांगलाच फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत निर्यातक्षम उत्पादन घेतल्यास प्रगती करणे सहज शक्य असल्याचे सेवक झंझाड सांगतात.भेंडी उत्पादनातून चार लाख ७५ हजार नफासेवक झंझाड यांनी आपल्या शेतात मलचिंग पेपर आणि ठिबक सिंचनावर दोन एकरामध्ये भेंडी आणि चार एकरात मिरचीची लागवड केली होती. चार महिन्यात भेंडीचे १९ टन ७७८ किलो उत्पादन झाले. त्यातून खर्च वजा जाता चार लाख ७४ हजार रुपये निव्वळ नफा झाला. मिरचीच्या दोन तोडणीतून दोन लाख ५८ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सेवक झंझाड सांगतात.जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम भाजीपाल्याची लागवड करण्याची गरज आहे. मलचिंग व ठिबक सिंचनाचा वापर करुन भाजीपाला पिकाचे उत्पादन वाढविता येते. कृषी विभागातील प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना फायदा होतो.- मिलींद लाडउपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

टॅग्स :vegetableभाज्या