शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

भंडारा जिल्ह्यातल्या भाज्या निघाल्या सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 16:56 IST

भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे पाठबळ हरदोलीची भेंडी, मिरची दुबई-कतारला

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शेतकरी निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन घेण्याकडे वळत आहे.भंडारा जिल्हा म्हणजे भात उत्पादन असे समीकरण झाले आहे. मात्र अलीकडे भात शेती परवडत नसल्याने शेतकरी विविध प्रयोग करीत आहे. त्यातच गत काही वर्षात पालेभाज्या उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. गुणवत्तापुर्ण पालेभाज्यांना स्थानिक बाजारातच नव्हे तर परदेशातील बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील सेवकराम झंझाड यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला आता सातासमुद्रापार दुबई, कतार येथे निर्यात केला जात आहे.सेवकराम झंझाड यांच्याकडे सहा एकर शेती असून या शेतीत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांच्या मार्गदर्शनात त्यांनी नागपूर येथे ‘वनामती’मध्ये प्रशिक्षण घेतले. तेथून खऱ्या अर्थाने निर्यातक्षम पालेभाजा उत्पादनाला सुरवात झाली. निर्यातक्षम उत्पादन घेवून त्यांनी प्रगतीचा नवा मार्ग चोखाळला आहे. नागपूर येथील मित्राय फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला दुबई-कतार येथे निर्यात केला जात आहे. त्यातून त्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक नफा मिळत आहे. भेंडीला स्थानिक बाजारात १५ ते १६ रुपये किलो दर मिळतो. तोच आता निर्यातीमुळे २४ रुपये किलो मिळत आहे. मिरचीतही त्यांना चांगलाच फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत निर्यातक्षम उत्पादन घेतल्यास प्रगती करणे सहज शक्य असल्याचे सेवक झंझाड सांगतात.भेंडी उत्पादनातून चार लाख ७५ हजार नफासेवक झंझाड यांनी आपल्या शेतात मलचिंग पेपर आणि ठिबक सिंचनावर दोन एकरामध्ये भेंडी आणि चार एकरात मिरचीची लागवड केली होती. चार महिन्यात भेंडीचे १९ टन ७७८ किलो उत्पादन झाले. त्यातून खर्च वजा जाता चार लाख ७४ हजार रुपये निव्वळ नफा झाला. मिरचीच्या दोन तोडणीतून दोन लाख ५८ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सेवक झंझाड सांगतात.जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम भाजीपाल्याची लागवड करण्याची गरज आहे. मलचिंग व ठिबक सिंचनाचा वापर करुन भाजीपाला पिकाचे उत्पादन वाढविता येते. कृषी विभागातील प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना फायदा होतो.- मिलींद लाडउपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

टॅग्स :vegetableभाज्या