शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

भाजीपाला विकला जातोय कवडीमोल भावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:12 IST

आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर एकदमच कमी असल्याने ग्राहकही अचंभित होत अत्यंत कमी रुपयात थैली भरीत बळीराजाचे आभार व्यक्त केले. मागील खरीपानंतर निघालेल्या बागायतीत टमाटरने तर हद्द पार केली.

ठळक मुद्देफटका शेतकऱ्याला : वांगी, टमाटर, कोबी, लवकी, काकडी पाच रुपये किलो

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर एकदमच कमी असल्याने ग्राहकही अचंभित होत अत्यंत कमी रुपयात थैली भरीत बळीराजाचे आभार व्यक्त केले. मागील खरीपानंतर निघालेल्या बागायतीत टमाटरने तर हद्द पार केली. १ ते ३ रुपये एवढा चिल्लरचा भाव होता तर शेतकऱ्याला त्याचा थोकात काय मोबदला मिळाला असेल हे न विचारलेले बरे.आता तर लग्नसराईची धूम सुरु असताना वांगी केवळ १-२ रुपये एवढ्या कमी भावात विकत असल्याने तोडणीचा व वाहतुकीचा खर्च सुद्धा निघत नाही. वांगी तोडण्यापर्यंतचा कठोर निर्णय शेतकऱ्याने घेतला आहे. फुलकोबी, पानकोबी, हिरवीकोबी चा सुद्धा हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेल्याने भाजीपाल्याची शेती नुकसानदायक ठरली. बाजारात भाजीपाल्याला मागणीच नसल्याने व पुरवठा अधिक असल्याने भाव गडगडलेच आहेत.मधला अडत्या मात्र सुखीशेतकऱ्याचा माल लहान किंवा स्थानिक बाजारात विकत नसल्याने मोठ्या बाजारात अडत्याकडे पाठवून विक्री केली जाते. यात अडत्या आपला कमीशन काढून व्यापाऱ्याला व शेतकऱ्याला माल विकतो. महाराष्ट्रात ७० टक्के भाजीपाला अडत्याच्या माध्यमातून विकला जातो. अडत्याला विकलेल्या रकमेच्या निश्चित ठरावाने अडत मिळतेच. व्यापारी व शेतकरी मात्र स्वत: धोका पत्करत भाजीपाला उत्पादीत करतो व विकतो. हल्ली तर भाजीपाला नागपूर, भंडारा येथे थोक बाजारातून पुन्हा उत्पादीत गावाकडेच व्यापाºयांच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणी न्येत आहे.पालांदूर आठवडी बाजारात किरकोळ दरात वांगे, टमाटर, लवकी, काकडी पाच रुपये प्रतिकिलो ने विकता विकले नाही. मिरची १५-२० रु. किलो, कारले ४०-५० किलो, फुलकोबी १०-२० प्रती किलो विकण्याचा प्रयत्न सुरु होता. सायंकाळी ५ वाजतापर्यंत किरकोळ दुकानावर भाजीपाला शिल्लकच होता हे विशेष.