शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पूरग्रस्त १३० गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

भंडारा : अचानक उद्भवलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करताना प्रशासनासोबतच गावकऱ्यांनाही मोठे अडचणीचे जाते. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता यंदा पूरपरिस्थितीचा सामना ...

भंडारा : अचानक उद्भवलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करताना प्रशासनासोबतच गावकऱ्यांनाही मोठे अडचणीचे जाते. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता यंदा पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पुराचा फटका बसणाऱ्या जिल्ह्यातील नदीतिरावरील १३० गावांचा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा (व्हीडीएमपी) तयार करण्यात आला असून सरपंचापासून वायरमनपर्यंत आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांचा समावेश असणारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चार जणांचा महापुरात बळी गेला तर अनेक पशुधनाची जीवितहानी झाली. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफच्या दोन आणि एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. भंडारा शहरही अर्धे जलमय झाले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन सभा आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आता जिल्ह्यातील पूरबाधित गावात गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून दरवर्षी १३० गावांना पुराचा फटका बसतो. या गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गावातील नागरिक आदींची समिती तयार करून काम निश्चिती करण्यात आली आहे. प्रत्येक गावात तात्पुरते निवासी शिबिर निश्चित करण्यात आले आहे. वीज, औषधी, पिण्याचे पाणी, निवासी सुविधा आधीच तयार करण्यात येणार आहे तसेच या शिबिरांमध्ये जनरेटरही उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात अँटीव्हेनम लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक संभावित पूरबाधित गावांची उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा केली तर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रमुख व मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना कसा करावा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

बाॅक्स

सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांच्या अध्यक्षतेत समित्या

गाव आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार १३० ही गावात पाच समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेत तात्पुरते निवारे समिती, तलाठ्यांच्या अध्यक्षतेत गावस्तरावर संसाधन निर्मिती समिती, सरपंचांच्याच अध्यक्षतेत गाव बचाव समिती, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या अध्यक्षतेत गाव आरोग्य समिती आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेत तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी या पाच समित्यांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

बाॅक्स

गर्भवती मातांची यादी तयार

पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर गर्भवती मातांना सुरक्षितस्थळी हलविणे मोठे जिकीरीचे जाते. गतवर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा संभावित पूरग्रस्त गावातील गर्भवती मातांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या गावातील गर्भवती मातांना आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.

नदीतिरावरील पूरबाधित गावे

जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून १३० गावांना महापुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २७, मोहाडी १७, तुमसर २४, पवनी ३४, साकोली ३, लाखांदुर १८ आणि लाखनी तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीतिरावर ९९ गावे असून त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. चुलबंद नदीच्या तिरावरील ३१ पैकी २१, सुर नदीच्या ११ पैकी ७, कन्हानच्या ४ पैकी ३ आणि बावनथडीच्या ९ पैकी नऊही गावांचा पुराचा फटका बसतो.

कोट

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. १३ मे रोजी पहिली आणि ३ जून रोजी दुसरी सभा घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थिती हाताळण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच आंतरराज्यीय समन्वय समितीची सभाही घेण्यात आली. जिल्ह्यात सात ठिकाणी माॅकड्रील आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.