शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

पूरग्रस्त १३० गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

भंडारा : अचानक उद्भवलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करताना प्रशासनासोबतच गावकऱ्यांनाही मोठे अडचणीचे जाते. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता यंदा पूरपरिस्थितीचा सामना ...

भंडारा : अचानक उद्भवलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करताना प्रशासनासोबतच गावकऱ्यांनाही मोठे अडचणीचे जाते. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता यंदा पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पुराचा फटका बसणाऱ्या जिल्ह्यातील नदीतिरावरील १३० गावांचा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा (व्हीडीएमपी) तयार करण्यात आला असून सरपंचापासून वायरमनपर्यंत आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांचा समावेश असणारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चार जणांचा महापुरात बळी गेला तर अनेक पशुधनाची जीवितहानी झाली. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफच्या दोन आणि एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. भंडारा शहरही अर्धे जलमय झाले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन सभा आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आता जिल्ह्यातील पूरबाधित गावात गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून दरवर्षी १३० गावांना पुराचा फटका बसतो. या गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गावातील नागरिक आदींची समिती तयार करून काम निश्चिती करण्यात आली आहे. प्रत्येक गावात तात्पुरते निवासी शिबिर निश्चित करण्यात आले आहे. वीज, औषधी, पिण्याचे पाणी, निवासी सुविधा आधीच तयार करण्यात येणार आहे तसेच या शिबिरांमध्ये जनरेटरही उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात अँटीव्हेनम लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक संभावित पूरबाधित गावांची उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा केली तर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रमुख व मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना कसा करावा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

बाॅक्स

सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांच्या अध्यक्षतेत समित्या

गाव आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार १३० ही गावात पाच समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेत तात्पुरते निवारे समिती, तलाठ्यांच्या अध्यक्षतेत गावस्तरावर संसाधन निर्मिती समिती, सरपंचांच्याच अध्यक्षतेत गाव बचाव समिती, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या अध्यक्षतेत गाव आरोग्य समिती आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेत तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी या पाच समित्यांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

बाॅक्स

गर्भवती मातांची यादी तयार

पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर गर्भवती मातांना सुरक्षितस्थळी हलविणे मोठे जिकीरीचे जाते. गतवर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा संभावित पूरग्रस्त गावातील गर्भवती मातांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या गावातील गर्भवती मातांना आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.

नदीतिरावरील पूरबाधित गावे

जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून १३० गावांना महापुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २७, मोहाडी १७, तुमसर २४, पवनी ३४, साकोली ३, लाखांदुर १८ आणि लाखनी तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीतिरावर ९९ गावे असून त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. चुलबंद नदीच्या तिरावरील ३१ पैकी २१, सुर नदीच्या ११ पैकी ७, कन्हानच्या ४ पैकी ३ आणि बावनथडीच्या ९ पैकी नऊही गावांचा पुराचा फटका बसतो.

कोट

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. १३ मे रोजी पहिली आणि ३ जून रोजी दुसरी सभा घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थिती हाताळण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच आंतरराज्यीय समन्वय समितीची सभाही घेण्यात आली. जिल्ह्यात सात ठिकाणी माॅकड्रील आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.