शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पूरग्रस्त १३० गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

भंडारा : अचानक उद्भवलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करताना प्रशासनासोबतच गावकऱ्यांनाही मोठे अडचणीचे जाते. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता यंदा पूरपरिस्थितीचा सामना ...

भंडारा : अचानक उद्भवलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करताना प्रशासनासोबतच गावकऱ्यांनाही मोठे अडचणीचे जाते. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता यंदा पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पुराचा फटका बसणाऱ्या जिल्ह्यातील नदीतिरावरील १३० गावांचा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा (व्हीडीएमपी) तयार करण्यात आला असून सरपंचापासून वायरमनपर्यंत आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांचा समावेश असणारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चार जणांचा महापुरात बळी गेला तर अनेक पशुधनाची जीवितहानी झाली. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफच्या दोन आणि एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. भंडारा शहरही अर्धे जलमय झाले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन सभा आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आता जिल्ह्यातील पूरबाधित गावात गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून दरवर्षी १३० गावांना पुराचा फटका बसतो. या गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गावातील नागरिक आदींची समिती तयार करून काम निश्चिती करण्यात आली आहे. प्रत्येक गावात तात्पुरते निवासी शिबिर निश्चित करण्यात आले आहे. वीज, औषधी, पिण्याचे पाणी, निवासी सुविधा आधीच तयार करण्यात येणार आहे तसेच या शिबिरांमध्ये जनरेटरही उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात अँटीव्हेनम लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक संभावित पूरबाधित गावांची उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा केली तर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रमुख व मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना कसा करावा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

बाॅक्स

सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांच्या अध्यक्षतेत समित्या

गाव आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार १३० ही गावात पाच समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेत तात्पुरते निवारे समिती, तलाठ्यांच्या अध्यक्षतेत गावस्तरावर संसाधन निर्मिती समिती, सरपंचांच्याच अध्यक्षतेत गाव बचाव समिती, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या अध्यक्षतेत गाव आरोग्य समिती आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेत तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी या पाच समित्यांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

बाॅक्स

गर्भवती मातांची यादी तयार

पूरपरिस्थिती उद्भवल्यानंतर गर्भवती मातांना सुरक्षितस्थळी हलविणे मोठे जिकीरीचे जाते. गतवर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा संभावित पूरग्रस्त गावातील गर्भवती मातांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या गावातील गर्भवती मातांना आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.

नदीतिरावरील पूरबाधित गावे

जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून १३० गावांना महापुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २७, मोहाडी १७, तुमसर २४, पवनी ३४, साकोली ३, लाखांदुर १८ आणि लाखनी तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीतिरावर ९९ गावे असून त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. चुलबंद नदीच्या तिरावरील ३१ पैकी २१, सुर नदीच्या ११ पैकी ७, कन्हानच्या ४ पैकी ३ आणि बावनथडीच्या ९ पैकी नऊही गावांचा पुराचा फटका बसतो.

कोट

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. १३ मे रोजी पहिली आणि ३ जून रोजी दुसरी सभा घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थिती हाताळण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच आंतरराज्यीय समन्वय समितीची सभाही घेण्यात आली. जिल्ह्यात सात ठिकाणी माॅकड्रील आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.