शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाची वक्रदृष्टी: शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

By admin | Updated: June 27, 2016 00:38 IST

हवामान खात्याने मान्सून आल्याची दिलेली बातमी आणि पावसाच्या आगमनाच्या दूरदर्शनवर आलेले वृत्त बघून ...

दुबार पेरणीचे संकट : अर्दळा भरल्या गर्दळा? रोहिणी आणि मृग नक्षत्रांनी दगा दिलाभंडारा : हवामान खात्याने मान्सून आल्याची दिलेली बातमी आणि पावसाच्या आगमनाच्या दूरदर्शनवर आलेले वृत्त बघून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. ओलिताची साधने असलेल्या काही शेतकऱ्यांनी ६३५ हेक्टर पऱ्हे घातलेत. हलक्या पावसाने पेरलेले बियाणे कोंब घेऊन आहे. पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. गतवर्षी दुष्काळी परिस्थितीने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळा असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाळा जास्त असल्याने आणि पाऊस लागून पडला तर पेरण्या करणे कठीण जाणार, या भीतीने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच शेती मशागतीचे कामे करून ठेवली आहे. मान्सून विदर्भात दाखल होताच पेरण्या करण्यासाठी शेतकरी तयार होता. १६ जूनला हवामान विभागाने विदर्भा मार्ग मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित केले. वृत्त वाहिन्यांनी तर नागपुरात पाऊस कोसळत असल्याचे दाखविले. त्यामुळे मान्सूनचे आगमन विदर्भात झाल्याचे मानून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी १५ ते २० जूनच्या दरम्यान भराभर पेरण्या आटोपून घेतल्या. याच कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझीम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता. तो पाऊसच शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. पावसाने हुलकावणी दिल्याने मातीच्या पोटात फुगलेले बियाणे कडक उन्हामुळे अंकुर घेऊन कोमेजून गेले. पिकांची ही स्थिती पाहून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. गेल्यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसून कोमेजलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी कशीबशी शेती उभी करण्याचा प्रयत्न केला होता. पावसाच्या दग्याने तो आता जमिनदोस्त झाला आहे. (नगर प्रतिनिधी)बियाणासाठी मदत देण्याची मागणी संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आणि ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. ओढून तोडून आणलेला हातचा पैसा आता संपला आहे. दुबार पेरणीसाठी आता बियाणे कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या हवामान खात्यानेच चुकीचे अंदाज वर्तवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याने शासनाने आता तलाठ्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे पुरवावे, अशी मागणी कॉग्रेसचे जिल्हा महासचिव प्रेमसागर गणविर यांनी केली आहे. पुरुषोत्तम डोमळे सानगडीशेतकऱ्यांना मागील काही दिवसांपासून ग्रहण लागले. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ. प्रत्येक वेळी न भरून निघणारे नुकसान होत आहे. यंदा रोहिणी व मृग नक्षत्र दोघेही बहीण भाऊ रुसले. पावसाची चिन्हे नाहीत. अर्दळा नक्षत्र लागला तरी गर्दळा भरल्या नाहीत. हवामान खात्याने काही दिवस पाऊस पडणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे खरीप हंगाम पुन्हा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरीपाची पेरणी केली. हंगामाच्या सुरुवातीला अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होता. त्यानंतर पावसाने आपले उग्ररुप दाखविल्यामुळे जिल्ह्यात चार वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. शेतीमध्ये तलावासारखे पाणी साचून होते. काही जणांनी कसेबसे शेतपिक पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. अतिवृष्टीची नोंद शासनदरबारी करण्यात आली. शासनाची मदत शेतकऱ्यांचे आसवे पुसू शकली नाही. त्यानंतर रबी पिकांचे वेळी पावसाने दगा दिला. ऐन पीक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकऱ्यांनी रबी हंगामातही फेडू शकले नाही. मागील वर्षी झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशोने शेतकरी मोठ्या उत्साहाने यावर्षी खरिपासाठी तयार झाला आहे. मशागतीची कामे आटोपली. कठीण असलेली पैशाची जुळवाजुळव केली. बियाणे खताची खरेदी केली. रोहिणी व मृगाचा पाऊस पडला की जोमात पेरणी करायची असा मानस होता. मात्र पावसाने दगा दिला.पंधरवडा उलटला तरी पावसाचे चिन्हे नाहीत. आता मृगानंतर आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली असून आतापर्यंत गर्दळा भरल्या नाहीत. शेती कशी करायची असा शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी दमदार पाऊस पडेल अशी वरुणराजाकडे आशा व्यक्त करीत आहेत. देवाला साकडे सुद्धा घालत आहेत. परंतु वरुण राजाची कृपादृष्टी केव्हा होणार हे कुणालाच ठाऊक नाही. आणखी काही दिवस पाऊस पडणार नाही, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.