शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

राष्ट्रीय शिक्षण धोरणाविरोधात विविध संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:18 IST

भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ चा मसुदा प्रसिध्द केला. हा मसुदा केवळ हिंदी व इंग्रजी या दोनच भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या मसुद्यासंदर्भात प्रतिक्रिया, सुचना व आक्षेप नोंदविण्यासाठी केवळ महिन्याभराचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे हा मसुदा भारताच्या प्रमुख २२ प्रादेशिक भाषांमध्ये त्वरित उपलब्ध करुन द्यावा, तसेच यातील सुधारणेच्या सुचनांसाठी किमान तीन महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी तुमसरातील समता सैनिक दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आदी अनेक संघटनांनी केली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : २२ प्रादेशिक भाषांमध्ये मसुदा व सुधारणेसाठी मुदतवाढीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ चा मसुदा प्रसिध्द केला. हा मसुदा केवळ हिंदी व इंग्रजी या दोनच भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या मसुद्यासंदर्भात प्रतिक्रिया, सुचना व आक्षेप नोंदविण्यासाठी केवळ महिन्याभराचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे हा मसुदा भारताच्या प्रमुख २२ प्रादेशिक भाषांमध्ये त्वरित उपलब्ध करुन द्यावा, तसेच यातील सुधारणेच्या सुचनांसाठी किमान तीन महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी तुमसरातील समता सैनिक दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आदी अनेक संघटनांनी केली आहे.राष्टÑीय शिक्षण धोरण २०१९ चा मसुदा हा केवळ दोनच भाषांमध्ये उपलब्ध असल्याने तो सामान्य बहुसंख्य नागरिकांना समजू शकत नाही. म्हणून हा ६५० पानी मसुदा प्रमुख २२ भाषांमध्ये शासनाने उपलब्ध करावा. तसेच सुचनांसाठी एका महिन्याचा कालावधी अत्यल्प असल्याने तो किमान तीन महिन्यासाठी वाढवून द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच शिक्षणाचे वाढते खाजगीकरण व बाजारीकरण रोखून शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे. समाजातील सर्वांना समान, मोफत, दर्जेदार व राज्यवित्तपोषित शिक्षण द्यावे, अशा अनेक मागण्या या निवेदनात केल्या आहेत.मोफत व समान शिक्षण मिळणे हा देशातील प्रत्येक लहान मुलाचा अधिकार असून ती सर्वस्वी सरकारची मुलभूत जबाबदारी आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाचे बाजारात रुपांतर झाल्याचे दिसून येत आहे. २०१९ च्या या मसूद्यामध्ये खाजगीकरणावर भर दिला आहे. याशिवाय स्कुल, कॉम्प्लेक्सच्या नावाखाली जिल्ीा परिषद व शासकीय शाळा बंद पाडण्याचा डाव आहे. शिक्षकांच्या पदभरतीमध्ये कंत्राटीकरण केले असून त्याच्या पात्रेतेत बदल केले आहेत. एवढे करुन टीईटी ही परिक्षा सुध्दा बंधनकारक केली आहे.दानशूर व्यक्ती या नावाखाली भांडवलदार लोकांना शाळा, महाविद्यालय उभारणी, शुल्क आकारणी, अभ्यासक्रम, कर्मचारी भरती अशा अनेक बाबतीत अमर्याद स्वातंत्र्य दिले आहे. यामुळे शिक्षणाचा पुन्हा एकदा बाजार होण्यास मोठी मदत होणार आहे. म्हणून हा मसुदा संविधान विरोधी व जनताविरोधी आहे. याच कारणाने कुठलीही जाहिरात न करता हे धोरण पुढे रेटले जात आहे. हा मसुदा सामान्य लोकांपर्यंत पोचून त्याची चिकित्सा होणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून तुर्तास मुदतवाढ व भाषांतराची मागणी केली आहे, असे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह केंद्रातील मंत्री व सर्वोच्च न्यायालय यांना पाठविण्यात आले आहे.