शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘रांजी’च्या विघ्नातून ‘विघ्नहर्त्यां’ची सुटका

By admin | Updated: September 23, 2015 00:52 IST

तीन शतकांपूर्वी पानघाटवर गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, हे गणेश मंदिर अडगळीत पडले होते.

भाविकांचे आकर्षण : ऐतिहासिक स्थापनेला मिळाला उजाळाअशोक पारधीपवनी तीन शतकांपूर्वी पानघाटवर गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, हे गणेश मंदिर अडगळीत पडले होते. रांजीची (बास/वेळी) झुडूपांचे अस्तित्व वाढले. विघ्नहर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायांवरच या रांजीमुळे विघ्न ओढवल्याचे चित्र होते. गणेशचतुर्थीनिमित्त गणेशभक्तांनी श्रींच्या मंदिर परिसरातील रांजीचे झुडूप हटविले असून, जणू विघ्नहर्त्यावरील विघ्न टळल्याचा भास होवू लागला आहे.रांजीच्या झुडूपात सापडल्याने या मंदिरातील गणेशाला रांजीतील महागणपती अशी ओळख पडली. घोडेघाट वॉर्डातील युवा गणेशभक्तांनी गणेशोत्सवाचा विडा उचलून मूर्तीची स्थापना न करता रांजीतील महागणपती मंदिरात श्रीगणेश आराधना सुरु केली आहे. ऐतिहासीक पवनी नगरातील गणेश मंदिरांची संख्या व प्रत्येक मंदिरातील श्रीगणेशांच्या स्थापित केलेल्या मूर्ती यांचा विचार केल्यास प्राचीन काळात या नगरात मोठ्या संख्येने गणेशभक्त असावे असा अंदाज बांधता येतो. नगरातील लोक रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत झाले. येथील प्रसिद्ध मुरलीधर मंदिर, दत्तमंदिर, एकटांग्या मारोती मंदिर व अलीकडेच नवनिर्मित श्री टेम्बेस्वामी मंदिर परिसरात वैनगंगा नदी काठावरील पानखिडकी घाटालगत करकाचे रांजीत महागणपतीची स्थापना तीन शतकापूर्वी करण्यात आल्याचे अभ्यासकांचे मत आहे. नगरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या आकाराची एकाच दगडात कोरलेली मूर्ती अस्तित्वात नसावी. साधारत: सात फूट उंच मूर्ती एकाच दगडात कोरलेली असून मंदिराचे भिंतीपासून अलिप्त आहे. मूर्तीसभोवार गाभाऱ्यातच प्रदक्षिणा करता येईल, अशी स्थापना करण्यात आलेली आहे. पवनी सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाने जोडलेली नव्हती. त्यावेळी भंडारा मार्गाने येणारे पादचारी पानखिडकी मार्गे पवनीमध्ये प्रवेश करायचे व प्रथम श्री गणेश रांजीतील महागणपती व नंतर सर्वतोभद्र (पंचमुखी) गणेशाचे दर्शन घेवून कामकाजाला सुरुवात करायचे. भोसलेंच्या कालखंडात मंदिराचा जिर्णोद्धार झालेला असावा, असा कयास आहे. प्रसिद्ध मुरलीधर मंदिराची देखभाल नागपूर येथे वास्तव्यास असलेले काळीकर कुटुंबिय करीत आहे. महागणपती सुद्धा त्यांच्या मालकीच्या जागेत आहे. घोडेघाट वॉर्डातील युवा गणेशभक्तांनी गेल्या चार पाच वर्षापासून गणेशोत्सवात मंदिरावर विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता व मंदिराची रंगरंगोटी करणे सुरु केले आहे. परिसरात अजूनही करकाच्या रांजी आहेत. पूर्वी दाटीवाटीने करकाच्या रांजी होत्या. त्यामुळे रांजीतील महागणपती असे संबोधल्या जात होते. पूर्वी वैनगंगा नदीला महापूर यायचा. तेव्हा पुराचे पाण्याचा स्पर्श महागणपतीच्या पावलास झाला की पूर ओसरणे सुरु व्हायचे असे बुजुर्ग सांगतात. मनमोहक व आकर्षक मूर्ती असलेल्या परिसरात जाणारे भाविक महागणपतीचे दर्शन घेऊनच बाहेर पडतात.