शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

By admin | Updated: November 11, 2014 22:36 IST

पर्यावरण संतुलनाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. याचाच एक भाग म्हणून प्लास्टिकचा कमीतकमी वापर झाला पाहिजे. हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे,

भंडारा : पर्यावरण संतुलनाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. याचाच एक भाग म्हणून प्लास्टिकचा कमीतकमी वापर झाला पाहिजे. हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे, मात्र महाराष्ट्रात नाही. हिमाचल प्रदेशातील डलहौसी, कुलू-मनाली, सिमला या शहरात प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदाच्या पिशव्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे राजस्थानातील उदयपूर, जोधपूर या शहरातही पेपर बॅग वापरल्या जातात.भंडारा जिल्ह्यात परवानाधारक कारखान्यांची संख्या सात प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नागपूर जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांची निमिर्ती करणाऱ्या फक्त दहा कारखान्यांनाच परवानगी दिली आहे. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. प्लास्टिकचे रिसायकलिंग करणाऱ्या कारखान्यांना महामंडळ प्रोत्साहन देत आहे. असे कारखाने जास्तीतजास्त सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यात रिसायकलिंग करणारे कारखाने नाहीत. तशी दखलही घेण्यात आलेली नाही. मोठ्या शहरात ग्रॅन्युअल्स तयार केल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या तयार केल्या जातात. दुर्दैवाने हे ग्रॅन्युअल्स अप्रमाणित जाडीच्या पिशव्या तयार करणारे छोटे युनिटच खरेदी करताना दिसत आहेत.कारवाई मात्र तरीही विक्री४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्यांवर आरोग्य विभागातर्फे कारवाई केली जाते. आरोग्य विभागाचे पथक दर आठवड्याला बाजारपेठेत पाहणी करते. माहिती मिळताच अशा कारखान्यांवरही धाडी घातल्या जातात. मात्र, त्यानंतरही काही विक्रेते कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करतात. जनजागृती करूनही याकडे विक्रेत्यांचे दुर्लक्ष होते. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढतच चालला आहे. त्यामुळे त्याचे विविध विपरित परिणाम दिसू लागले आहेत. याबाबत सामाजिक संघटनांकडून जनजागृती होत असली तरी काही काळापुरताच त्याचा परिणाम दिसून येतो, हेही वास्तव आहे. प्लास्टिकमुळे कागदी व कापडी पिशव्यांचे मार्केट अवघे १० टक्क्यांवर आले असले तरी, बाजारातील मागणीप्रमाणे कागदी पिशव्यांचे उत्पादन करणे सहज शक्य असल्याचा दावा कागदी पिशव्यांच्या उत्पादकांनी केला आहे. प्लास्टिक पिशव्यांवर सरसकट बंदी आणली तरच कागदी पिशव्यांची मागणी वाढणार आहे. मागणी नसल्याने कागदी पिशव्या बनविणारे उत्पादकही कमी आहेत. आता कागदी पिशव्या यंत्रावरही झटपट तयार करता येतात. त्यामुळे बाजारातील मागणीप्रमाणे उत्पादन करणे सहज शक्य असल्याचा विश्वास कागदी पिशव्यांच्या व्यवसायातील माहितीदारांनी व्यक्त केला. मात्र, याविषयीची अनास्थाच दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)