शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:13 IST

पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढून व्हॅनला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

ठळक मुद्देवाहतूक बंद : देव्हाडी शिवारातील रपट्यावरून दोन फूट पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी शिवारातील रपट्यावरून दोन फुट पाणी वाहत होते. पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढून व्हॅनला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या रखडले आहे.तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा घोषीत करण्यात आला.सदर रस्त्याचे सीमेंट काँक्रीटचे कामे सुरु आहेत. कामाची गती मंद आहे. देव्हाडी शिवारात पुल भूईसपाट करून नवीन पुल बांधण्यात आले. जुन्या रपट्यातून बायपास रस्ता तयार करण्यात आला. रपट्याखालून सिमेंट पाईप घालण्यात आले. एकाच पाईपमधून पाणी गतीने जात नाही. त्यामुळे रपट्यावर सुमारे दोन फुट पाणी वाहत आहे.पुलाचे बांधकाम झाल्यानंतर दोन्ही बाजूला मुरुमाचे भराव करण्यात आले नाही. मातीमिश्रीत मुरुम काही प्रमाणात घालण्यात आले. त्यामुळे अप्रोच रस्ता मातीमाप झाला आहे.या रस्त्यावरून दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. सकाळी ९ ते ९.३० दरम्यान एसटी बसगाड्या रपट्यातील पाण्यातून नेण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या बंद आहे. त्याचा फटका वाहतुकदारांना बसत आहे.एमआयडीसीत शिरले पाणीतुमसर-गोंदिया मार्गावर रपट्याजवळच एमआयडीसी आहे. पुलाखालून पाण्याचा विसर्ग होत नसल्याने नाला फुगून त्याचे पाणी एमआयडीसीत शिरले आहे. सध्या एमआसयडीसीतील रस्ते जलमय झाले आहेत. नियोजनाचा अभाव येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिसत आहैे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची वाट लागली असून राष्ट्रीय महामार्ग धोकादायक ठरत असल्याचा आरोप डॉ.पंकज कारेमोरे यांनी लावला आहे. अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही डॉ.कारेमोरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rainपाऊसhighwayमहामार्ग