शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:13 IST

पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढून व्हॅनला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

ठळक मुद्देवाहतूक बंद : देव्हाडी शिवारातील रपट्यावरून दोन फूट पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी शिवारातील रपट्यावरून दोन फुट पाणी वाहत होते. पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढून व्हॅनला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या रखडले आहे.तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा घोषीत करण्यात आला.सदर रस्त्याचे सीमेंट काँक्रीटचे कामे सुरु आहेत. कामाची गती मंद आहे. देव्हाडी शिवारात पुल भूईसपाट करून नवीन पुल बांधण्यात आले. जुन्या रपट्यातून बायपास रस्ता तयार करण्यात आला. रपट्याखालून सिमेंट पाईप घालण्यात आले. एकाच पाईपमधून पाणी गतीने जात नाही. त्यामुळे रपट्यावर सुमारे दोन फुट पाणी वाहत आहे.पुलाचे बांधकाम झाल्यानंतर दोन्ही बाजूला मुरुमाचे भराव करण्यात आले नाही. मातीमिश्रीत मुरुम काही प्रमाणात घालण्यात आले. त्यामुळे अप्रोच रस्ता मातीमाप झाला आहे.या रस्त्यावरून दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. सकाळी ९ ते ९.३० दरम्यान एसटी बसगाड्या रपट्यातील पाण्यातून नेण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या बंद आहे. त्याचा फटका वाहतुकदारांना बसत आहे.एमआयडीसीत शिरले पाणीतुमसर-गोंदिया मार्गावर रपट्याजवळच एमआयडीसी आहे. पुलाखालून पाण्याचा विसर्ग होत नसल्याने नाला फुगून त्याचे पाणी एमआयडीसीत शिरले आहे. सध्या एमआसयडीसीतील रस्ते जलमय झाले आहेत. नियोजनाचा अभाव येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिसत आहैे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची वाट लागली असून राष्ट्रीय महामार्ग धोकादायक ठरत असल्याचा आरोप डॉ.पंकज कारेमोरे यांनी लावला आहे. अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही डॉ.कारेमोरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rainपाऊसhighwayमहामार्ग