शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:13 IST

पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढून व्हॅनला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

ठळक मुद्देवाहतूक बंद : देव्हाडी शिवारातील रपट्यावरून दोन फूट पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी शिवारातील रपट्यावरून दोन फुट पाणी वाहत होते. पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढून व्हॅनला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या रखडले आहे.तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा घोषीत करण्यात आला.सदर रस्त्याचे सीमेंट काँक्रीटचे कामे सुरु आहेत. कामाची गती मंद आहे. देव्हाडी शिवारात पुल भूईसपाट करून नवीन पुल बांधण्यात आले. जुन्या रपट्यातून बायपास रस्ता तयार करण्यात आला. रपट्याखालून सिमेंट पाईप घालण्यात आले. एकाच पाईपमधून पाणी गतीने जात नाही. त्यामुळे रपट्यावर सुमारे दोन फुट पाणी वाहत आहे.पुलाचे बांधकाम झाल्यानंतर दोन्ही बाजूला मुरुमाचे भराव करण्यात आले नाही. मातीमिश्रीत मुरुम काही प्रमाणात घालण्यात आले. त्यामुळे अप्रोच रस्ता मातीमाप झाला आहे.या रस्त्यावरून दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. सकाळी ९ ते ९.३० दरम्यान एसटी बसगाड्या रपट्यातील पाण्यातून नेण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या बंद आहे. त्याचा फटका वाहतुकदारांना बसत आहे.एमआयडीसीत शिरले पाणीतुमसर-गोंदिया मार्गावर रपट्याजवळच एमआयडीसी आहे. पुलाखालून पाण्याचा विसर्ग होत नसल्याने नाला फुगून त्याचे पाणी एमआयडीसीत शिरले आहे. सध्या एमआसयडीसीतील रस्ते जलमय झाले आहेत. नियोजनाचा अभाव येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिसत आहैे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची वाट लागली असून राष्ट्रीय महामार्ग धोकादायक ठरत असल्याचा आरोप डॉ.पंकज कारेमोरे यांनी लावला आहे. अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही डॉ.कारेमोरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rainपाऊसhighwayमहामार्ग