शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

धानशेती पाण्याखाली, अनेक घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:13 IST

जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवघ्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक घरांची पळझड झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात झाला. या पावसाने अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे.

ठळक मुद्देसातही तालुक्यात अतिवृष्टी : पावसाने मंगळवारी दिवसभर उसंत घेतल्याने मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवघ्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक घरांची पळझड झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात झाला. या पावसाने अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे.साकोलीत ३९ घरांची पडझडसाकोली तालुक्यात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने ३९ घरांची पडझड झाली. त्यात ३३ घरे अंशत:, पाच गोठे अंशत: आणि एक घर पूर्णत: कोसळले आहे. तालुक्यात सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. साकोली तालुक्यात ९०.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी एस.के. कारेमोरे यांनी दिली. तालुक्यातील कुंभली, खंडाळा, पळसगाव, सुकळी, महालगाव, सानगडी, सासरा, कलंधरा, वांगी, बोळदे, शिवणीबांध, झाडगाव, सावरबंध आदी गावांमध्ये घरांची पडझड झाल्याची नोंद आहे.लाखनीत सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद लाखनी तालुक्यात १८५ मिमी करण्यात आली. तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पालांदूर परिसरात पावसाने अनेक पुल पाण्याखाली आले होते. मातीच्या घरांचे नुकसान झाले. दिवसभर या पावसामुळे वाहतूक ठप्प होती. पालांदूर मंडळांतर्गत ३३ घरे व एक गोठा पडून दोन लाख ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले. बंडू खंडाईत रा.पालांदूर यांचे घर या पावसात कोसळले. तर मासळ परिसरात या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. खोलगट भागात पाणी साचले होते. मासळ, बाचेवाडी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. तर ब्रम्ही मार्गावरील रस्त्यावर एक ते दोन फुट पाणी साचल्याचे दिसत होते. मासळ येथील गोवर्धन गोंडाणे, रुपचंद गोंडाणे, तुळजाबाई मानकर, कुसुम पिल्लेवान, निर्मला गजघाटे, भास्कर चुटे यांच्या घराची पडझड झाली.मोहाडी तालुक्यात पाणीच पाणीमोहाडी तालुक्यात सर्वदूर भूभाग जलमय झाल्याचे दिसत आहे. नदी नाले ओढे तुडूंब भरून वाहत आहे. सूर नदीही दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यात मोहाडी मंडळात ११६.५ मिमी, वरठी १२५.२ मिमी, आंधळगाव ९५.६ मिमी, कान्हळगाव ९०.२ मिमी, करडी ७६.५ मिमी आणि कांद्री येथे १७०.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे धानपीक बुडाले आहे. रोहणा दहेगाव, मोहाडी चौंडेश्वरी, मोहाडी महालगाव, कान्हळगाव पिंपळगाव या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे २५ ते ३० गावांचा संपर्क तुटला आहे. रोहणा येथील आबादी परिसर जलमय झाला असून पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची माहिती महसूल विभागाकडून गोळा करण्यात येत असल्याचे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी सांगितले. तालुक्यात १२८ घरांची अंशत: नऊ घरे पूर्णत: तर सात गोठे या पावसात उध्वस्त झाली. नऊ जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उसर्रा येथील गोठ्यांची पडझड झाली आहे. भय्यालाल पारधी यांच्या गोठ्यांची पडझड होऊन २० हजार रुपये नुकसान झाल्याची माहिती आहे.नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - आमदार वाघमारेजिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तहसीलदार व तलाठ्यांनी मुख्यालयी राहण्याचे निर्देश देत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार चरण वाघमारे यांनी प्रशासनाला दिले आहेत.तुमसर तालुक्यात प्रचंड नुकसानतुमसर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. सिलेगाव, रनेरा येथील लहान नाल्यावर पाणी होते. तर तुमसर शहरातील विनोबा नगर, राजाराम लॉनमागील परिसर आणि मातोश्री शाळेजवळ पाणी साचले होते.प्रशासनाने दिली ऐनवेळेवर शाळांना सुटीहवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. रात्रभर मुसळधार पाऊस बरसला. प्रशासनाने मंगळवारी सकाळी शाळा महाविद्यालयांना सुटी घोषित केली. मात्र सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन पालक पोहचले होते. भर पावसात पालक आपल्या चिमुकल्यांना त्याठिकाणी घेऊन गेले. शाळेला सुटी असल्याचे तेथे गेल्यानंतर माहित झाल्याने मनस्ताप सहन करीत अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन घरी परतले. शाळांनी पाठविलेले संदेशही पालकांपर्यंत व्यवस्थित पोहचले नाहीत. सोमवारीच शाळांना सुटी घोषित केली असती तर सकाळचा मनस्ताप सहन करावा लागला नसता असे अनेक पालकांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर