शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

गैरप्रकार करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

By admin | Updated: March 2, 2015 00:58 IST

शासनाने कॉपीमुक्त अभियान राबविले यामुळे शालांत परीक्षा दहावी, बारावी परिक्षेत होत असलेले गैरप्रकार सुरुच असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले आहे.

कोंढा (कोसरा) : शासनाने कॉपीमुक्त अभियान राबविले यामुळे शालांत परीक्षा दहावी, बारावी परिक्षेत होत असलेले गैरप्रकार सुरुच असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले आहे. यासाठी यापुढचे पाऊल म्हणून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवठा करणाऱ्या शाळा, महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे.शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या हेतुने शालांत दहावी, बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. बोर्डाची दहावी, बारावी परिक्षेत गैरप्रकार वाढले. यामध्ये परीक्षा केंद्रावर काम करणारे केंद्र संचालक, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांचा समावेश होता. परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवठा करताना पर्यवेक्षक, केंद्रसंचालक आढळले तर लगेच त्यांना अटक करण्यात येईल असे आदेश काढले. अशा प्रकरणात अनेक शिक्षकांना अटक झाली. तेव्हा शिक्षकांनी धास्ती घेऊन हे अभियान राबविणे सुरु केले. विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास सहा महिने कारावासची शिक्षा तर परीक्षा केंद्रावरील शिक्षक पर्यवेक्षकांपासून केंद्र संचालक व इतर कर्मचारी यांनी गैरप्रकार केल्यास एक वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद शासनाने नविन कायदयात केली असल्याने शिक्षकांनी धास्ती घेतली. मागील अनेक वर्षापासून कॉपीमुक्त अभियान सुरु आहे. अशातच बोर्डाने सर्व शिक्षणाधिकारी यांना बैठे पथक परीक्षा केंद्रावर ठेवण्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे अनेक शाळांचे निकाल कमी लागले. निकालाची टक्केवारी घसरल्याने शिक्षक अतिरिक्त झाले. तसेच नविन शाळांचे अनुदानपात्र निकष पुढे केले. पंरतु उपाय म्हणून पुन्हा संस्थापकानी शिक्षकावर दबाव आणून दहावी, बारावी परीक्षा केंद्रावर शाळांचा निकाल लागला पाहिजे यासाठी पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवठा करण्यास भाग पाडत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसत आहे. तुरळक कॉपी संस्थापकाच्या आर्शिवादाने सुरु आहे. अशावेळी गैरप्रकार करणाऱ्या शाळांची मान्यताच रद्द करण्याचा विचार शासन करीत आहे. तेव्हाच कॉपीमुक्त अभियान शंभर टक्के यशस्वी होईल, अशी अनेक शिक्षक प्रतिक्रिया देत आहे. (वार्ताहर)