शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दोन वर्षानंतरही ‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:33 IST

महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाघ असलेला व आशियाचा आयकॉन ठरलेला ‘जय’ नामक वाघ बेपत्ता होऊन १८ एप्रिलला दोन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकार, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, केंद्र सरकारची गुप्तचर संस्थांनी ‘जय’ला शोधण्यात सपशेल फेल ठरल्या आहेत.

ठळक मुद्देसर्वकाही गुलदस्त्यात : उरल्या केवळ ‘जय’च्या आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाघ असलेला व आशियाचा आयकॉन ठरलेला ‘जय’ नामक वाघ बेपत्ता होऊन १८ एप्रिलला दोन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकार, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, केंद्र सरकारची गुप्तचर संस्थांनी ‘जय’ला शोधण्यात सपशेल फेल ठरल्या आहेत. ‘जय’चे काय झाले याविषयी कोणीही सांगू शकत नाही. ‘जय’चे बेपत्ता होण्यामागील रहस्य कायम आहे.पर्यटकांना व जनतेला ‘जय’ची आठवण राहावी म्हणून हॉटेल सनशाईन येथे ‘जय’ प्रेमी हॉटेल मालक देवराज बावनकर यांनी ‘जय’ वाघाची पाच फुट लांबीची प्रतिकृती बनविली आहे. ‘जय’ कायमची आठवण राहावी यासाठी पवनीमध्ये ‘जय’चा पुतळा बनविण्याची मागणी पर्यटनप्रेमी करीत आहेत. जय गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील खापरी डोंगर महादेव पाहुणगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये आला होता. तेव्हा तो अडीच ते तीन वर्षाचा होता. या जंगलाचा समावेश नंतर उमरेड पवनी करांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात करण्यात आला. काही दिवसातच ‘जय’ वाघ या अभयारण्याचा हिरो ठरला. मोठ्या संख्येने पर्यटक ‘जय’ला पाहण्यासाठी येत होते. दहा दिवस पर्यंत आॅनलाईन बुकींग चालत होती. शेकडो पर्यटकांना प्रतिक्षा यादीवर राहावे लागत होते. अनेक सेलीब्रीटींनीही ‘जय’ला पाहण्यासाठी हजेरी लावली होती.भारदस्त शरीरयष्टी, देखणेपण, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाई, पाच फुट लांबी आदी गुणांनी जय हा पर्यटकांना येथे येण्यास भुरळ घालीत होता. अल्पावधीतच जय ने या अभयारण्याच्या व प्रादेशिक वन विभागाच्या जंगलावर आपले साम्राज्य निर्माण केले होते. अनेक मोठ्या वाघांना ‘जय’ने पळवून लावले होते. येथे ‘जय’चा एवढा दरारा होता की इतर कोणताही वाघ जय च्या धाकाने भटकत नव्हता.जयच्या विविध गुणांमुळे तो भारतातील एक महत्वपूर्ण वाघ ठरला होता. कोणताही वाघ हा १०० चौरस किलोमिटर फिरतो. पण ‘जय’ हा अभयारण्याच्या १८९ किलोमिटर व प्रादेशिक वनविभागाच्या १०० किलोमिटर अशा २५० किलोमिटरच्या जंगलात मुक्तपणे फिरत होता. जय हा अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात आठ दिवस तर उमरेड भिवापूर कºहांडला जंगलात आठ दिवस राहात होता. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्यामुळे मरू नदी पूर्णपणे भरली असतानाही जय नदी पोहून पलिकडे जात होता.‘जय’ने अभयारण्याच्या जंगलाशिवाय आपले फिरण्याचे क्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या नागभिड, ब्रम्हपुरी पर्यंतच्या जंगलात वाढविले होते. त्यामुळे डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेतील डॉ.बिलाल हबीब यांच्या नेतृत्वाखालील चमूने जय ला दोनदा रेडीओ आय डी कॉलर लावले होते. नागझिरा जंगलात माणसांना पाहून असणारा जय कोणालाही घाबरत नव्हता. माणसावर जय ने कधीही हल्ला केला नाही.‘जय’ नामक वाघाच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचा तपास सुरू असून त्यांचा अहवाल आल्यानंतर याबाबत बोलता येईल.- विवेक होशिंग,उपवनसंरक्षक, भंडारा

टॅग्स :Tigerवाघ