शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाचा दोनच गावांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

तुमसर तालुक्यात किमान सात ते आठ दिवस अवकाळी पाऊस पडला. ढगाळ वातावरण, कुठे गारपीट झाली. त्यामुळे फळ व भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली होती. येथे थातूरमातूर चौकशी व पाहणी करण्यात आली.

ठळक मुद्देपरसवाडा, लोहारा गावांचा समावेश : २५ टक्के पेक्षा कमी नुकसानीची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. परंतु तालुक्यात केवळ दोनच गावात भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. सदर दोन्ही गावात नुकसानीची टक्केवारी २५ टक्क्यापेक्षा कमीच दाखविण्यात आली. पंचनामे करताना संंबंधित कर्मचारी बांधावर गेले होते काय, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.तुमसर तालुक्यात किमान सात ते आठ दिवस अवकाळी पाऊस पडला. ढगाळ वातावरण, कुठे गारपीट झाली. त्यामुळे फळ व भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली होती. येथे थातूरमातूर चौकशी व पाहणी करण्यात आली. तालुक्यात केवळ परसवाडा, सिहोरा व लोहारा येथे फळ, भाजीपाला शेतीचे नुकसान झाल्याची नोंद कृृषी विभागाने केली आहे. त्यातही २५ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.शासकीय नियमानुसार २५ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच लाभ होतो. त्यापेक्षा कमी नुकसान झालेल्यांना लाभ होत नाही. वास्तविक स्थिती वेगळी आहे. फळ, भाजीपाला लागवड करणाऱ्यां शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा पंचनामे करून संबंधित विभागाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी येथे दखल घेण्याची गरज आहे.कृषी विभागाने परसवाडा व लोहारा येथे फळ,भाजीपाल्याचे नुकसान २५ टक्क्यापेक्षा कमी झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.-गजेंद्र बालपांडे,तहसीलदार, तुमसर.

टॅग्स :Rainपाऊस