शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू, गुन्हा दाखल

By युवराज गोमास | Updated: February 18, 2024 19:58 IST

लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपूरी शेतशिवारातील घटना

युवराज गोमासे/ भंडारा : शेतशिवारात पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपूरी शेतशिवारात १८ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजतादरम्यान गस्तीवरील वनरक्षकामुळे उघडकीस आली. शवविच्छेदन अहवालानंतर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

वनविभाग भंडारा अंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र लाखनी, नियतक्षेत्र रामपुरी गावातील शेतशिवारात दोन नर असवल मृत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी मौका स्थळ पाहणी केली असता श्रीराम गायधने रा. रामपुरी यांचे खासगी शेती गट क्रमांक ४४५/२ व राजकुमार कोडापे यांचे खासगी शेती गट क. ४७८ मध्ये दोन नर अस्वल मृतावस्थेत आढळले. दाेन्ही शेतकऱ्यांचे शेतशिवार जंगलालगत आहेत. प्रकरणी शवविच्छेदनाकरीता पालांदूर येथील पशुधन विकास अधिकारी देवयानी नगराळे यांना पाचारण करण्यात आले.

शवविच्छेदनानंतर दोन्ही अस्वलांचा मृत्यू जीवंत विद्युत प्रवाहाने झाल्याचा प्राथमिक अंदाज दर्शविण्यात आला. दोन्ही मृत अस्वलांच्या छातीवर विद्युत प्रवाहाच्या निशाणी दिसून आल्या. मात्र, अस्वलांचे नखे व दातांसह सर्व अवयव साबूत असल्याचे दिसून आले. प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रकरणाची चौकशी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई, साकोली येथील सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, अतिक्रमण निर्मुलन) रोशन राठोड यांचे मार्गदर्शनात लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी, गोखले करीत आहेत. आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शवविच्छेदनावेळी मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी अजहर हुसैन व मोठ्या संख्येने वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पीक संरक्षणासाठी विद्युत प्रवाह टाळण्याचे आवाहनजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक संरक्षण करण्याकरीता विद्युत प्रवाहाचे वापर करणे टाळावे. विद्युत धक्क्याने होणारे वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे अघोरी काम थांबवावे. अशा घटनांची गोपनिय माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा विभागीय कार्यालय भंडारा, वनपरिक्षेत्र कार्यालय लाखनी येथे प्रत्यक्ष येवुन माहिती देता येईल, असे आवाहन वनविभागाचेवतीने करण्यात आले आहे.

चोवीस तासातील दुसरी घटनातुमसर तालुक्यातील रोंघा नियतक्षेत्रात १७ फेब्रुवारी रोजी एका नर बिबट्याचा मृतदेह आढळला. नाल्यातील खोलगट भागात तीन ते चार दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू होवून त्याचे संपूर्ण अवयव साबूत होते. त्या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच २४ तासात दोन नर अस्वलांचा पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जीवंत विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. वनविभागाने या प्रकरणी गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा