शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

स्वकीयांपेक्षा विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न

By admin | Updated: October 4, 2014 23:23 IST

विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या चौकोनी लढतीमुळे सर्वपक्षीय उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला असून, स्वकीयांची नाराजी सांभाळत विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत.

भंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या चौकोनी लढतीमुळे सर्वपक्षीय उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला असून, स्वकीयांची नाराजी सांभाळत विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत. विशेष करून उमेदवारीवरून स्वकीयांवर नाराज झालेली मंडळीच या निवडणुकीत ‘हुकमी एक्के’ ठरू पाहत असल्याने पडद्याआडच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिकच महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्यामुळे विशेष करून शिवसेना - भाजपाच्या इच्छुकांच्या अपेक्षांना मोठया प्रमाणात धुमारे फुटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यावरून त्यांच्यातील स्पर्धा टोकाला गेली आहे. त्यातून निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वी युती होईल, असेच चित्र असल्याच्या कारणावरून तर जागा सुटेल की नाही, उमेदवारी मिळेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती मिळत नसल्याने अनेकांनी पक्षांतर करून उमेदवारीसाठी दावेदारीही केली. प्रत्यक्षात युती दुभंगल्याने दोन्ही पक्षांत अनेकांना संधी मिळाली असली, तरी जागा एक व इच्छुक अनेक असल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजीही व्यक्त होऊ लागली. अशा परिस्थितीत बहुरंगी लढतीत स्वकीयांतील नाराजांबरोबरच विरोधकातील नाराजांवर निवडणूकीच्या यशाचे गणित अवलंबून असल्याने व तीच डोकेदुखी असल्याने अघिकृत उमेदवारांनी त्याकडे गांभीर्याने घेण्यासाठी सुरूवात केली आहे. स्वकीयांची नाराजी पक्षाचे नेते काढतील असे गृहीत धरून विरोधी पक्षातील नाराजांना गळ टाकला जात आहे. त्यांची नाराजी मतांमध्ये परिवर्तन व्हावी, यासाठी थेट नाराजांशी न बोलता, दिवसातील उजेडाऐवजी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकरवी ‘समेट’ घडविण्यासाठी सुरूवात केली आहे. यासाठी रात्रीचा अंधारच अधिक प्रभावी ठरू लागला आहे. त्यात राजकीय डावपेच व व्युहरचना आखले जात आहेत. निवडणूक रिंगणातील जवळपास सर्वच उमेदवारांनी अशा प्रकारच्या छुप्या तडजोडींना प्राधान्य देत त्यातून निवडणूक सोपी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)