शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शहरात वाहतूक नियंत्रक दिव्यांची वाणवा

By admin | Updated: January 10, 2015 00:29 IST

जिल्हास्थळ असलेल्या भंडारा शहरात वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. याची जाणीव जिल्हा प्रशासनासह, नगरपालिका, शहरवासियांना असली तरी त्यांना याचे काही सोयरसुतक वाटत नाही.

देवानंद नंदेश्वर  भंडाराजिल्हास्थळ असलेल्या भंडारा शहरात वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. याची जाणीव जिल्हा प्रशासनासह, नगरपालिका, शहरवासियांना असली तरी त्यांना याचे काही सोयरसुतक वाटत नाही. जिल्हा प्रशासन, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व नगरपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने शहरात वाहतूक नियंत्रक दिव्यांची वाणवा आहे. परिणामी अनेकांना जीव मुठीत घेऊन मार्ग ओलांडावा लागतो.भंडारा शहराची लोकसंख्या जवळपास दीड लक्ष एवढी आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासन लाखो रुपये खर्चून विविध उपाययोजना राबवित असते. आठ वर्षांपुर्वी शहरात प्रायोगिक स्तरावर शहरातील जिल्हा परिषद चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आली होती. अनेकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्यामुळे नियमाचे उल्लंघन नित्याची बाब ठरत आहे. काही दिवसातच वाहतूक नियंत्रक दिव्यात तांत्रिक बिघाड आला. दिव्याच्या नादुरुस्तीला नगर पालिका जबाबदार आहे. पालिकेने त्याचे देयक भरले नसल्याची माहिती आहे. आजही वाहतूक नियंत्रक दिव्याची फाईल बंद आहे.शहरातील महात्मा गांधी चौक, खांब तलाव चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, नागपूर नाका चौक या प्रमुख चौकांसोबतच जिल्हा परिषद चौक, मिस्कीन टँक चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, शीतला माता मंदिर चौक, पोस्ट आॅफिस चौक, बसस्थानक चौक येथे वाहनांची नेहमी वर्दळ असते. शहरातील प्रमख चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. वाहनांचे वाढते प्रमाण, अतिक्रमणाचा विळखा, अरुंद रस्ते आदी विविध कारणांमुळे दिवसातून अनेकदा वाहतूक सेवा ठप्प होत असते. याचा रुग्णवाहिकालाही फटका बसतो. शहरातून राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. आठवडी बाजाराच्या दिवशी गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, पोष्ट आॅफिस चौकात वाहतुकीची कोंडी होत असते.