शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

शहरात वाहतूक नियंत्रक दिव्यांची वाणवा

By admin | Updated: January 10, 2015 00:29 IST

जिल्हास्थळ असलेल्या भंडारा शहरात वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. याची जाणीव जिल्हा प्रशासनासह, नगरपालिका, शहरवासियांना असली तरी त्यांना याचे काही सोयरसुतक वाटत नाही.

देवानंद नंदेश्वर  भंडाराजिल्हास्थळ असलेल्या भंडारा शहरात वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. याची जाणीव जिल्हा प्रशासनासह, नगरपालिका, शहरवासियांना असली तरी त्यांना याचे काही सोयरसुतक वाटत नाही. जिल्हा प्रशासन, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व नगरपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने शहरात वाहतूक नियंत्रक दिव्यांची वाणवा आहे. परिणामी अनेकांना जीव मुठीत घेऊन मार्ग ओलांडावा लागतो.भंडारा शहराची लोकसंख्या जवळपास दीड लक्ष एवढी आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासन लाखो रुपये खर्चून विविध उपाययोजना राबवित असते. आठ वर्षांपुर्वी शहरात प्रायोगिक स्तरावर शहरातील जिल्हा परिषद चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आली होती. अनेकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्यामुळे नियमाचे उल्लंघन नित्याची बाब ठरत आहे. काही दिवसातच वाहतूक नियंत्रक दिव्यात तांत्रिक बिघाड आला. दिव्याच्या नादुरुस्तीला नगर पालिका जबाबदार आहे. पालिकेने त्याचे देयक भरले नसल्याची माहिती आहे. आजही वाहतूक नियंत्रक दिव्याची फाईल बंद आहे.शहरातील महात्मा गांधी चौक, खांब तलाव चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, नागपूर नाका चौक या प्रमुख चौकांसोबतच जिल्हा परिषद चौक, मिस्कीन टँक चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, शीतला माता मंदिर चौक, पोस्ट आॅफिस चौक, बसस्थानक चौक येथे वाहनांची नेहमी वर्दळ असते. शहरातील प्रमख चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. वाहनांचे वाढते प्रमाण, अतिक्रमणाचा विळखा, अरुंद रस्ते आदी विविध कारणांमुळे दिवसातून अनेकदा वाहतूक सेवा ठप्प होत असते. याचा रुग्णवाहिकालाही फटका बसतो. शहरातून राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. आठवडी बाजाराच्या दिवशी गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, पोष्ट आॅफिस चौकात वाहतुकीची कोंडी होत असते.