शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ले-आऊटधारकांना वृक्ष लागवड बंधनकारक

By admin | Updated: October 14, 2015 00:49 IST

शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारी वृक्षांची कत्तल, यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

शासनाचे आदेश : वृक्ष लागवडीशिवाय बांधकाम केल्यास कारवाईचे गंडांतरभंडारा : शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारी वृक्षांची कत्तल, यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कठोर पावले उचलली आहेत. ले-आऊटला परवानगी देण्यापूर्वी या अकृषक भूखंडाच्या सर्व बाजूंनी तसेच घर बांधताना समोर वृक्ष लागवड केल्याशिवाय यापुढे बांधकामाला परवानगी देता येणार नाही. ज्यांनी वृक्ष लागवड केली नाही त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत.आज ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या धुऱ्यावरील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्याच्या बाजुला मोठ्या वृक्षाच्या बुंध्यामध्ये विस्तव टाकून वृक्ष जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. एका वृक्षाची परवानगी काढून दहा ते बारा झाडे तोडून अवैधरित्या लाकूड तस्करीत वाढ झाली आहे. विशेषत: शहराच्या बाजुला लेआऊ टाकताना झाडांची कत्तल करून जमिन अकृषक करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे परवानगीकरीता अर्ज करण्यात येते. शहरात घर बांधतांना नगर परीषद व ग्रामीण भागात घराचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी गरजेचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)यापुढे मालकावरही होणार कारवाई परवानगीची फाईल नगर परिषद, नगर पंचायत किंवा ग्रामपचांयत येथे टाकताना आपण वृक्ष लागवड केली असे प्रमाणपत्र व वृक्ष लागवड केल्याचे छायाचित्रे सोबत जोडावे लागणार आहे. लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करणार असल्याचे शपथपत्र सोबत जोडावे लागणार आहे. परवानगी दिल्यानंतर एका वर्षाने संबंधित यंत्रणेला लावलेल्या वृक्षाची पाहणी करावी लागणार आहे. अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना घराच्या परिसरात वृक्ष आढळले नाही तर चौकशी करून संबंधित मालकाविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी लागणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष यांची समिती नेमावी लागणार आहे. शहरी भागात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, नगराध्यक्ष, उपाध्यक्षांची समिती गठीत करावी लागणार आहे. संबधीत व्यक्तीने घर बांधणीपूर्वी वृक्ष लागवड केली किंवा नाही याचा अहवाल या समितीला तपासून घ्यावा लागणार आहे. तपासणीअंती संबंधित यंत्रणेने वृक्ष लागवडीपूर्वी परवानगी दिली असेल तर संबधीत कर्मचाऱ्यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस त्यानंतर निंलबनाची कारवाई होणार आहे. पर्यावरणाच्या बदलत्या असमतोलपणाचा फटका सर्वांनाच बसत आहे. दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते परंतू संवर्धन होत नाही. आता शासनाने वृक्ष लागवड संदर्भात घेतलेला निर्णय हा पर्यावरणपूरक असून सर्वांनी या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नगर पालिका यावर लक्ष देईल.- बाबूराव बागडे,नगराध्यक्ष, भंडारा.