शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंह टेकडीचा पर्यटन विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:50 IST

शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.

ठळक मुद्देएक कोटी ८० लाखांच्या विकास कामांना मंजूरी : मिळाले केवळ ५० लाख, उर्वरीत निधी केव्हा मिळणार?

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी व तुमसर तालुक्याच्या सीमेवरील देव्हाडा - माडगी पर्यटनीय तिर्थस्थळाच्या विकासासाठी राज्य पर्यटन विकास निधीतून विविध कामांसाठी सुमारे एक कोटी ८९ लाखांचा निधी तीन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला. परंतु शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.मोहाडी - तुमसर तालुक्याच्या सीमेवर वैनगंगा नदीपात्रातील बेटावर निर्मित भगवान नृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. या स्थळाला धार्मीक व पर्यटनीय महत्व आहे. पूर्व विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थळाच्या विकासासाठी अनेकांनी आश्वासनांची खैरात वाढली. मोठमोठ्या निधीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्ष निधी खेचून आणण्यात दमछाक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे स्थळ पर्यटनीय विकासापासून वंचित राहिला. कार्तिक पौर्णिमेला येथे १५ दिवसांची भव्य यात्रा भरते. या स्थळाला ऐतिहासिक महत्व असून पूर्व विदर्भात हजारो भाविक दरवर्षी येथे येतात.मंजूर पर्यटन विकास निधीचा पहिला २० लाखांचा टप्पा मिळाला. दुसºया टप्प्यात नुकताच ३० लाखांचा निधी प्राप्त झाला. प्राप्त एकूण ५० लाखांच्या निधीतून डांबर रस्ता, नाली बांधकाम, सेफ्टी वॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तीन वर्षात विकास निधी केवळ ५० लाख रुपयांचा मिळाला. निवडणुकासमोर असल्याने सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांंच्या निधींची घोषणा करण्याचा सपाटा चालविला आहे. आश्वासनानंतर आश्वासने दिली जात आहेत. परंतु पाच वर्षापूर्वी निवडणुकीत मुंढरी ते रोहा पुलाच्या निर्माणाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाहीत. बंद पडलेले उद्योग सुरु झालेले नाही. नृसिंह टेकडीसाठी पुरेसा निधी खेचून आणला गेला नाही. आता चौंडेश्वरी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकासासाठी दोन कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगून भूमिपूजन उरकण्यात आले. परंतु निधी पूर्ण मिळणार काय? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांचा आहे.राज्य शासनाच्या पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी उर्वरित एक कोटी ३९ लाखांचा निधी मिळणे गरजेचे होते. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु मोठ्या निधीची घोषणा करून पाठ थोपटण्यात धन्यता मानली जात असल्याने नृसिंह टेकडीचा पर्यटनीय विकास रखडला आहे. भंडारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेला आहे.पर्यटनासाठी सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे.उर्वरीत विकास कामांना लागला 'ब्रेक'राज्याच्या पर्यटन विकास निधीतून स्थळापर्यंत जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण, सीमेंटीकरण, नाली बांधकाम, सायकल स्टँड, सेफ्टीवॉल, सभामंडप, किचनरुम, अतिथीगृह, शौचालय व वॉशरुम आदी कामे केली जाणार आहे. ५० लाखांच्या निधीतून डांबररस्ता, नाली बांधकाम, सेफ्टीवॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. उर्वरीत कामांना निधीअभावी 'ब्रेक' लागला आहे.

टॅग्स :Templeमंदिर