शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

ज्येष्ठांचे तीन महिन्यांचे मानधन अडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST

कोरोना संकटाने सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. दैनंदिन व्यवहार अडचणीचे झाले. शेतकऱ्यांच्या अनेक घरात निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. शेतकरी अठराविश्वे ...

कोरोना संकटाने सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. दैनंदिन व्यवहार अडचणीचे झाले. शेतकऱ्यांच्या अनेक घरात निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. शेतकरी अठराविश्वे दारिद्र्यात आहे. संकटकालीन स्थितीत शासनाचे ज्येष्ठांना मिळणारे मानधन लाख मोलाचे ठरत आहे. दरमहा हजार रुपयाचे मानधन औषधीकरिता व कुटुंबाकरिता आधार आहे. परंतु जूनपासून लाभार्थ्यांना मानधन मिळाले नसल्याने वृद्धांची आर्थिक अडचण वाढली आहे.

शासनाने दरमहा नियमित ज्येष्ठांना आर्थिक सहकार्य करणे काळाची गरज बनली आहे. फार जुनी असलेली योजना अजूनही टिकून आहे. यावरून योजनेचे महत्त्व शासनासह प्रशासनाला सुद्धा कळले आहे. गरजू लाभार्थ्यांना या योजनेमुळे हायसे वाटले आहे.

चौकट

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना शासनाच्यावतीने हजार रुपये दरमहा मानधन पुरविले जाते. हजार रुपयांचे मानधन ज्येष्ठांना अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित मानधन मिळत नसल्याने आर्थिक समस्या येत आहेत. बँकेत जमा झाले का, म्हणून पायऱ्या झिजवण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे. बँकेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दररोज विचारणा वाढलेली आहे. बापू , बँकेत पैसे आले का गा! असे विचारताच नाही जी म्हणायला काळजात धस्स होत आहे.

कोट

वृद्धापकाळ मानधन योजनेचे दोन महिन्यांचा निधी अगदी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. जून व जुलै महिन्याचे मानधनाचे नियोजन सुरू आहे.

प्रतिभा दोनोडे, प्रभारी तहसीलदार लाखनी

मायबाप सरकार, प्रत्येक महिन्याला आमचे हजार रुपये दिले तर फारच चांगले होईल. महागाईत हजार रुपयेही पुरत नाहीत. उधारी कुणी देत नाही. दिलीच तर वस्तूंचे दर अधिक घेतात. याच पैशावर आमचे पोट आहे.

पारबता नेवारे, लाभार्थी पालांदूर