शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने लाखांदुरात शोककळा

By admin | Updated: October 25, 2014 22:35 IST

महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या

लाखांदूर : महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या पाल्याकडून वाहनाचा गैरवापर होत तर नाही ना? याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. जीवाची पर्वा न करता भरधाव वाहने चालविण्याची पैज लावतात आणि जीव गमावतात. लाखांदूर येथील तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने पालकांनाच सजग होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारला रात्री लाखांदूर येथील चंदन खत्री या तरुणाने घरची कार बाहेर काढली. त्यात चार मित्रांना बसविले. हे पाचही मित्र सायंकाळी गावात फिरले. त्यानंतर ‘धूम’ स्टाईल बाईक चालवितात तसे कार चालवायला निघाले. अंतरगावजवळ वळणावर वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने त्यांची कार झाडावर आदळली. त्यातच कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारच्या धडकेने करंजीची दोन झाडे मुळापासून उन्मळून कोसळली. होता. या अपघातात चंदन खत्री, सौरभ धोटे, प्रदीप तोंडरे या तिघांचा मृत्यू झाला.सर्वत्र शोककळाऐन दिवाळीला अपघात घडून तीन तरुणांचा जीव गेल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी पानटपरीवर बसून मौजमजा करणे तर कधी केवळ पान-खर्रा खाण्यासाठी वडसा-ब्रम्हपुरीला दुचाकीने जावून सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा हा छंद जीवावर बेतला. ही घटना रात्री घडल्यामुळे कुणालाही माहिती नव्हती. परंतु दिवस जसा उजाडला तशी गावावर शोककळा पसरली. आज दिवसभर गावात शोकाकूल वातावरण होते. दुपारच्यावेळी शोकाकूल वातावरणात तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवड्यात पाच जणांचा मृत्यूएका आठवड्यात लाखांदूर तालुक्यात तीन अपघात झाले. यात पाच जणांना जीव गमवावा लागला तर चार जण जखमी झाले. तरुणांमध्ये सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार वाढल्याने अपघातात वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाने अनेकवेळा यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकवर्गाचा असंतोष असल्याने पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.मागील वर्षीही दोघांचा मृत्यू मागील वर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी लाखांदूर येथे एका कुटुंबात मुली व जावई आले होते. सकाळी फिरण्यासाठी निघाले असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हे वळणमार्ग धोकादाय बनले आहे. (तालुका प्रतिनिधी)