शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने लाखांदुरात शोककळा

By admin | Updated: October 25, 2014 22:35 IST

महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या

लाखांदूर : महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या पाल्याकडून वाहनाचा गैरवापर होत तर नाही ना? याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. जीवाची पर्वा न करता भरधाव वाहने चालविण्याची पैज लावतात आणि जीव गमावतात. लाखांदूर येथील तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने पालकांनाच सजग होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारला रात्री लाखांदूर येथील चंदन खत्री या तरुणाने घरची कार बाहेर काढली. त्यात चार मित्रांना बसविले. हे पाचही मित्र सायंकाळी गावात फिरले. त्यानंतर ‘धूम’ स्टाईल बाईक चालवितात तसे कार चालवायला निघाले. अंतरगावजवळ वळणावर वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने त्यांची कार झाडावर आदळली. त्यातच कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारच्या धडकेने करंजीची दोन झाडे मुळापासून उन्मळून कोसळली. होता. या अपघातात चंदन खत्री, सौरभ धोटे, प्रदीप तोंडरे या तिघांचा मृत्यू झाला.सर्वत्र शोककळाऐन दिवाळीला अपघात घडून तीन तरुणांचा जीव गेल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी पानटपरीवर बसून मौजमजा करणे तर कधी केवळ पान-खर्रा खाण्यासाठी वडसा-ब्रम्हपुरीला दुचाकीने जावून सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा हा छंद जीवावर बेतला. ही घटना रात्री घडल्यामुळे कुणालाही माहिती नव्हती. परंतु दिवस जसा उजाडला तशी गावावर शोककळा पसरली. आज दिवसभर गावात शोकाकूल वातावरण होते. दुपारच्यावेळी शोकाकूल वातावरणात तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवड्यात पाच जणांचा मृत्यूएका आठवड्यात लाखांदूर तालुक्यात तीन अपघात झाले. यात पाच जणांना जीव गमवावा लागला तर चार जण जखमी झाले. तरुणांमध्ये सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार वाढल्याने अपघातात वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाने अनेकवेळा यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकवर्गाचा असंतोष असल्याने पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.मागील वर्षीही दोघांचा मृत्यू मागील वर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी लाखांदूर येथे एका कुटुंबात मुली व जावई आले होते. सकाळी फिरण्यासाठी निघाले असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हे वळणमार्ग धोकादाय बनले आहे. (तालुका प्रतिनिधी)