शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने लाखांदुरात शोककळा

By admin | Updated: October 25, 2014 22:35 IST

महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या

लाखांदूर : महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या पाल्याकडून वाहनाचा गैरवापर होत तर नाही ना? याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. जीवाची पर्वा न करता भरधाव वाहने चालविण्याची पैज लावतात आणि जीव गमावतात. लाखांदूर येथील तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने पालकांनाच सजग होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारला रात्री लाखांदूर येथील चंदन खत्री या तरुणाने घरची कार बाहेर काढली. त्यात चार मित्रांना बसविले. हे पाचही मित्र सायंकाळी गावात फिरले. त्यानंतर ‘धूम’ स्टाईल बाईक चालवितात तसे कार चालवायला निघाले. अंतरगावजवळ वळणावर वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने त्यांची कार झाडावर आदळली. त्यातच कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारच्या धडकेने करंजीची दोन झाडे मुळापासून उन्मळून कोसळली. होता. या अपघातात चंदन खत्री, सौरभ धोटे, प्रदीप तोंडरे या तिघांचा मृत्यू झाला.सर्वत्र शोककळाऐन दिवाळीला अपघात घडून तीन तरुणांचा जीव गेल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी पानटपरीवर बसून मौजमजा करणे तर कधी केवळ पान-खर्रा खाण्यासाठी वडसा-ब्रम्हपुरीला दुचाकीने जावून सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा हा छंद जीवावर बेतला. ही घटना रात्री घडल्यामुळे कुणालाही माहिती नव्हती. परंतु दिवस जसा उजाडला तशी गावावर शोककळा पसरली. आज दिवसभर गावात शोकाकूल वातावरण होते. दुपारच्यावेळी शोकाकूल वातावरणात तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवड्यात पाच जणांचा मृत्यूएका आठवड्यात लाखांदूर तालुक्यात तीन अपघात झाले. यात पाच जणांना जीव गमवावा लागला तर चार जण जखमी झाले. तरुणांमध्ये सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार वाढल्याने अपघातात वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाने अनेकवेळा यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकवर्गाचा असंतोष असल्याने पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.मागील वर्षीही दोघांचा मृत्यू मागील वर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी लाखांदूर येथे एका कुटुंबात मुली व जावई आले होते. सकाळी फिरण्यासाठी निघाले असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हे वळणमार्ग धोकादाय बनले आहे. (तालुका प्रतिनिधी)