शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पोहायला जाणे जीवावर बेतले; मुरुमाच्या खाणीत तीन मुलांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 21:57 IST

गावालगतच्या मुरुमाच्या खाणीत (बोडी) पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील अत्री येथे सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देपवनी तालुक्यातील अत्रीची घटना

 

भंडारा : गावालगतच्या मुरुमाच्या खाणीत (बोडी) पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील अत्री येथे सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

प्रणय योगिराज मेश्राम (१७), संकेत बालक रंगारी (१७) आणि साहिल नरेश रामटेके (१९) रा. अत्री ता. पवनी अशी मृतांची नावे आहेत. तिघेही मित्र असून सोमवारी दुपारी ते बाहेर गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी परत आले नाही म्हणून त्यांचा शोध सुरू झाला. तेव्हा गावाजवळ असलेल्या मुरूमाच्या खाणीजवळ कपडे आणि चप्पला पडून असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली.

या घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सुधीर बोरकुटे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अत्रीच्या पोलीस पाटील संगीता सेलोकर, खैरीचे पोलीस पाटील देविदास डोकरे, नवरगावचे पोलीस पाटील भीमराव लोणारे यांच्यासह गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. तासभरानंतर ८.३० वाजताच्या सुमारास तिघांचेही मृतदेह आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथे रवाना केले.

 हे तिघेही दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुरुमाच्या खाणीत पोहायला गेल्याची माहिती आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मात्र आसपास कुणी नसल्याने अंदाज आला नाही. सायंकाळी मुले घरी का आली नाही म्हणून शोध सुरू झाला आणि रात्री त्यांचे मुरूमाच्या खाणीत मृतदेहच आढळले.प्रणय आणि संकेत पवनी तालुक्यातील कोंढा येथील अरुण मोटघरे महाविद्यालयात ११ व्या वर्गात शिकत होते. तर साहिलने गतवर्षीच शाळा सोडली होती. 

टॅग्स :Deathमृत्यू