शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रोमानियाच्या विमानतळावर तीन, तर हंगेरीच्या सीमेवर दोन विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत महाव्यवस्थापक असलेले अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हर्षित आता हंगेरीच्या सीमेवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच हर्षित हा लॅव्हिव्ह शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता; परंतु युद्ध सुरू झाल्याने तो तिथेच अडकला. ऑडिओ क्लिप पाठवून त्याने भयानक वास्तव स्थिती काय आहे याबाबत आई-वडिलांना सांगितले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगत युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव अजूनही टांगणीला आहे. यातच जिल्हा प्रशासनाने बुधवारी भंडारा जिल्ह्यातील युक्रेनमध्ये गेलेल्या पाचही विद्यार्थ्यांची यथापरिस्थिती सांगितली असून, तीन विद्यार्थी रोमानियाच्या विमानतळावर, तर दोन विद्यार्थी हंगेरीच्या सीमेवर असल्याची माहिती दिली आहे. यात हर्षित चौधरी व विनोद ठवकर हे दोघे विद्यार्थी हंगेरीच्या सीमेपर्यंत पोहोचले आहेत, तर श्रेयश निर्वाण, निकिता भोजवानी व प्रीतेश पातरे रोमानियाच्या विमानतळावर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. रशिया व युक्रेनमध्ये युद्धाची सुरुवात हाेऊन आठवडाभराचा कालावधी झाला आहे. भारतातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत महाव्यवस्थापक असलेले अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हर्षित आता हंगेरीच्या सीमेवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच हर्षित हा लॅव्हिव्ह शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता; परंतु युद्ध सुरू झाल्याने तो तिथेच अडकला. ऑडिओ क्लिप पाठवून त्याने भयानक वास्तव स्थिती काय आहे याबाबत आई-वडिलांना सांगितले होते. भंडाऱ्यातील साई मंदिर परिसरातील रहिवासी असलेल्या धीरज पात्रे यांचा मुलगा प्रीतेश हा एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला आहे. तो सध्या रोमानियाच्या विमानतळावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यासोबतच श्रेयश व निकिताही त्याच विमानतळावर असल्याचे सांगितले आहे. विनोद ठवकर हा विद्यार्थीसुद्धा हंगेरी देशाच्या सीमेपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. 

पालकांची चिंता संपेना- जोपर्यंत काळजाच्या तुकड्याला आपल्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत आमच्या जिवात जीव नाही. युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण होत असतानाच त्यांना परत यावे, असे म्हटले होते. मात्र, विद्यार्थ्यांवर दबाव आल्याने ते मायदेशी परतू शकले नाहीत. आता प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले आहे. अशातच मंगळवारी कर्नाटक राज्यातील रहिवासी असलेल्या नवीन नामक विद्यार्थ्याचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेने पालकांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. केव्हा एकदा आपला चिमुकला घरी परततो याचीच या पालकांना चातकासारखी प्रतीक्षा आहे.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी