शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:17 IST

Bhandara : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : मागील जुलै व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. याप्रकरणी तालुक्यातील प्रशासनाअंतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र मागील २ महिन्यांपासून क्षतिग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आहे. नुकसानभरपाई उपलब्ध करण्याच्या मागणीला घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठविले आहे. 

मागील २० ते २२ जुलै रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने झोडपून काढले होते. या अतिवृष्टीने तालुक्यातील तब्बल ८ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये तालुक्यातील १७ हजार १०८ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानप्रकरणी शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तर ९ ते १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ८५३ शेतकऱ्यांचे ३०८ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले आहे. 

या दोन्हीप्रकरणी स्थानिक लाखांदूर तहसील प्रशासनांतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्याची कारवाई होऊन जवळपास २ महिने लोटूनदेखील अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई उपलब्ध केली नाही. अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाल्याने हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष नरेश दिवठे, तालुका महासचिव गोविंदराव बरडे, दीपक चिमणकर, देवानंद नागदेवे, लोचन पारधी, दादा अलोणे, कारू भावे, ब्रह्मदास मेश्राम, राष्ट्रपाल लोणारे, खुशाबा गजभिये, अनिल पारधी, उमेश वनस्कर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती