शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:17 IST

Bhandara : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : मागील जुलै व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. याप्रकरणी तालुक्यातील प्रशासनाअंतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र मागील २ महिन्यांपासून क्षतिग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आहे. नुकसानभरपाई उपलब्ध करण्याच्या मागणीला घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठविले आहे. 

मागील २० ते २२ जुलै रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने झोडपून काढले होते. या अतिवृष्टीने तालुक्यातील तब्बल ८ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये तालुक्यातील १७ हजार १०८ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानप्रकरणी शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तर ९ ते १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ८५३ शेतकऱ्यांचे ३०८ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले आहे. 

या दोन्हीप्रकरणी स्थानिक लाखांदूर तहसील प्रशासनांतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्याची कारवाई होऊन जवळपास २ महिने लोटूनदेखील अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई उपलब्ध केली नाही. अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाल्याने हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष नरेश दिवठे, तालुका महासचिव गोविंदराव बरडे, दीपक चिमणकर, देवानंद नागदेवे, लोचन पारधी, दादा अलोणे, कारू भावे, ब्रह्मदास मेश्राम, राष्ट्रपाल लोणारे, खुशाबा गजभिये, अनिल पारधी, उमेश वनस्कर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती