शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लग्न कार्यातील हजारो किलो अन्न उकीरड्यावर

By admin | Updated: January 8, 2015 22:49 IST

सध्या शुभमंगल अर्थात लग्नसोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाले आहे. आनंदा-आनंदात लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र या शुभमंगलच्या माध्यमातून हजारो किलो अन्नाची नासाडी होताना दिसत आहे.

खराशी : सध्या शुभमंगल अर्थात लग्नसोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाले आहे. आनंदा-आनंदात लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र या शुभमंगलच्या माध्यमातून हजारो किलो अन्नाची नासाडी होताना दिसत आहे.लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमानेच लहान गावांमध्येही मंगलप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धतीच रूढ होताना दिसत आहे. या पद्धतीत अनेकजण भूक असो वा नसो ताटात भरपूर अन्न घेतात व नंतर खायला जड झाले की तसेच ताटात सोडून देतात. वर्षभऱ्याचा विचार करता साधारणत: लग्नाचे ३० ते ३५ मुहूर्त असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हजारो लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते आणि वाचलेले अन्न उकीरड्यावर फेकले जाते. त्यामुळे ही परिस्थिती विचित्र वाटत आहे.एकीकडे गरीब व्यक्ती पोट भराव म्हणून दिवसभर आटा-पिटा करतो तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणात अन्न उकीरड्यावर टाकल जाते. सध्याची परिस्थिती बघता उदाहरणादाखल लग्नसोहळे ज्या मंगल कार्यालयात होतात तिथे मेजवानी आटोपल्यानंतरचे चित्र पाहिल्यास मंगल कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत मोठ्याप्रमाणात भात, भाजी व इतरही खाद्यपदार्थ फेकलेले दिसतात.एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून लग्नकार्यात जेवणाच्या ताटीत २० टक्के अन्न उरलेले राहते व त्याची नासाडी होते, असा निष्कर्ष आहे. ताट वाहून घेण्याचा त्रास वाचावा यासाठी अनेकजण ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही जास्त अन्न वाहून घेतात प्रत्यक्षात ताटातील अर्ध्यापेक्षा जास्त अन्न वाया जाते. एका लग्नसमारंभात किसान १५० लोकांचे अन्न वाया जातो.विशेष म्हणजे हेच अन्न बाहेर फेकल्यामुळे त्यातुन मिथेन या घातक वायूची निर्मिती होते ती ग्लोबल वॉर्मिंग तसेच वातावरणातील बदलास कारणीभूत ठरते.एकीकडे कित्येक कुटूंब उपाशीपोटी झोपताना दिसतात तर दुसरीकडे हजारो किलो अन्न उकीरड्यावर फेकले जाते हे चित्र बंद होणे गरजेचे आहे. देशाचा विचार करता रोज ३० कोटी जनता उपाशी झोपते मग अशा परिस्थितीत लग्नातल्या अशा मेजवाण्या कितपत योग्य आहेत हा प्रश्न पडतो.लग्नात भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाने हवे तेवढेच घेतल्यास अन्न वाया जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने शुभमंगल होईल. अन्न वाया न जाता प्रत्येकाच्या पोटात जावा कारण अन्न हे पुर्वब्रम्ह असे म्हटले जाते. (वार्ताहर)