शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्न कार्यातील हजारो किलो अन्न उकीरड्यावर

By admin | Updated: January 8, 2015 22:49 IST

सध्या शुभमंगल अर्थात लग्नसोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाले आहे. आनंदा-आनंदात लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र या शुभमंगलच्या माध्यमातून हजारो किलो अन्नाची नासाडी होताना दिसत आहे.

खराशी : सध्या शुभमंगल अर्थात लग्नसोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाले आहे. आनंदा-आनंदात लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र या शुभमंगलच्या माध्यमातून हजारो किलो अन्नाची नासाडी होताना दिसत आहे.लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमानेच लहान गावांमध्येही मंगलप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धतीच रूढ होताना दिसत आहे. या पद्धतीत अनेकजण भूक असो वा नसो ताटात भरपूर अन्न घेतात व नंतर खायला जड झाले की तसेच ताटात सोडून देतात. वर्षभऱ्याचा विचार करता साधारणत: लग्नाचे ३० ते ३५ मुहूर्त असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हजारो लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते आणि वाचलेले अन्न उकीरड्यावर फेकले जाते. त्यामुळे ही परिस्थिती विचित्र वाटत आहे.एकीकडे गरीब व्यक्ती पोट भराव म्हणून दिवसभर आटा-पिटा करतो तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणात अन्न उकीरड्यावर टाकल जाते. सध्याची परिस्थिती बघता उदाहरणादाखल लग्नसोहळे ज्या मंगल कार्यालयात होतात तिथे मेजवानी आटोपल्यानंतरचे चित्र पाहिल्यास मंगल कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत मोठ्याप्रमाणात भात, भाजी व इतरही खाद्यपदार्थ फेकलेले दिसतात.एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून लग्नकार्यात जेवणाच्या ताटीत २० टक्के अन्न उरलेले राहते व त्याची नासाडी होते, असा निष्कर्ष आहे. ताट वाहून घेण्याचा त्रास वाचावा यासाठी अनेकजण ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही जास्त अन्न वाहून घेतात प्रत्यक्षात ताटातील अर्ध्यापेक्षा जास्त अन्न वाया जाते. एका लग्नसमारंभात किसान १५० लोकांचे अन्न वाया जातो.विशेष म्हणजे हेच अन्न बाहेर फेकल्यामुळे त्यातुन मिथेन या घातक वायूची निर्मिती होते ती ग्लोबल वॉर्मिंग तसेच वातावरणातील बदलास कारणीभूत ठरते.एकीकडे कित्येक कुटूंब उपाशीपोटी झोपताना दिसतात तर दुसरीकडे हजारो किलो अन्न उकीरड्यावर फेकले जाते हे चित्र बंद होणे गरजेचे आहे. देशाचा विचार करता रोज ३० कोटी जनता उपाशी झोपते मग अशा परिस्थितीत लग्नातल्या अशा मेजवाण्या कितपत योग्य आहेत हा प्रश्न पडतो.लग्नात भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाने हवे तेवढेच घेतल्यास अन्न वाया जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने शुभमंगल होईल. अन्न वाया न जाता प्रत्येकाच्या पोटात जावा कारण अन्न हे पुर्वब्रम्ह असे म्हटले जाते. (वार्ताहर)