शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

‘त्या’ मुलींना मिळणार सायकली

By admin | Updated: January 3, 2015 00:38 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सायकलींचे वाटप रखडल्यामुळे विद्यार्थिनींना पायीच शाळेत जावे लागत होते.

राजू बांते मोहाडीमानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सायकलींचे वाटप रखडल्यामुळे विद्यार्थिनींना पायीच शाळेत जावे लागत होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांनी पत्र काढून सायकल वाटपाचे निर्देश जारी केले. त्यामुळे आता लवकरच शाळेत पायी येणाऱ्या मुलींना सायकली मिळणार आहेत.शाळा सुरू होऊन सहा महिने झाले असताना मुलींना सायकली प्राप्त झाल्या नव्हत्या. या मुलींना मानव विकास योजनेतील बसचाही लाभ मिळत नव्हता. त्यामुळे तालुक्यातील मुलींना पायीच शाळेत जावे लागत होते. ‘लोकमत’मध्ये ‘मुलींची शाळेसाठी पायपीट’ हे वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी मुलींच्या समस्यांची माहिती घेऊन शिक्षण विभागाला याबाबत विचारणा केली. त्यानंतर शिक्षणाधिकारी (माध्य.) के.झेड. शेंडे यांनी मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर व साकोलीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना माहिती विचारली. मानव विकास कार्यक्रम २०१४-१५ इयत्ता ८ वी ने १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किलोमिटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याबाबत तत्काळ पत्र काढले. मानव विकास योजनेंतर्गत आता प्रत्येक तालुक्याला ६६६ सायकल वाटप करण्यात येणार आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांना दोन दिवसात लाभार्थी मुलींची यादी सादर करायची आहे. ज्या विद्यार्थिनींना मोफत बससेवा योजनेचा लाभ मिळत नाही अशा विद्यार्थिनींना मोफत सायकलीचा लाभ दिला जाणार आहे. आता शाळेमध्ये पायी येणाऱ्या मुलींच्या हातात सायकली येणार आहे. मानव विकास योजनेच्या मोहाडी तालुक्यात पाच बसेस धावतात. मोहाडी, कुशारी, रोहा बेटाळा या मार्गे येणारी बस रोहणा या गावी येत नाही. त्यामुळे रोहणा गावाच्या मुली बरेचदा नदीच्या पाणायातून पायवाट काढत पाच किलोमीटर अंतरावरून महात्मा जोतिबा फुले मोहगाव देवीच्या शाळेत येतात.याबाबत सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलींना बससेवेचा लाभ देण्यात यावा यासाठी गटशिक्षणािधकाऱ्यांनी २९ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हाधिकारी, परिवहन महामंडळाला पत्र दिले आहे. वैनगंगा नदीच्या पलीकडे असणाऱ्या अर्धा मोहाडी तालुका मानव विकास योजनेच्या बस सेवेपासून दूर राहावे लागत आहे. मानव विकास योजनेतून मुलींना निदान दहावीच्या परीक्षेपूर्वी सायकली मिळायला पाहिजेत. जिल्ह्यात पाच तालुक्याचा मानव विकास योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. ज्या मुली शाळेत पायी येतात त्या मुलींसाठी जिल्ह्यात ३,३३० मोफत सायकली मिळणार आहेत.