शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोनाकाळात १३ जणांनी केली आत्महत्या, भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

भंडारा : कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. बेरोजगारी, वाढती महागाई व अन्य सामाजिक कारणांनी भंडारा जिल्ह्यात १३ ...

भंडारा : कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. बेरोजगारी, वाढती महागाई व अन्य सामाजिक कारणांनी भंडारा जिल्ह्यात १३ जणांनी आत्महत्या केली. अशा कुटुंबांना किंवा भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बुद्धिवंतांनाही याबाबतीत विचार करावा, अशी वेळ आता येऊन ठेपली आहे. कोरोनाकाळात अनेक बेरोजगार झाले. उद्योगधंदेही डबघाईस आले. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अनेकांना मानसिक, आर्थिक व भावनिक त्रासही सहन करावा लागला. मात्र या काळात १३ जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत इहलोकाचा निरोप घेतला. अशा कुटुंबांना आता मदतीचा हात देण्याची गरज आहे. किंबहुना आगामी काळात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून भावनिक व आर्थिक आधार देण्याची नितांत गरज आहे. समाजातील उच्चभ्रू व दानशूर व्यक्तींनी या संबंधाने समोर येण्याची गरज आहे.

बॉक्स

हे दिवसही जातील

कोरोनासंकट काळात काहींना एकावेळचे जेवणही उपलब्ध झाले नाही. परंतु त्यांनी आस सोडली नाही. हे कठीण दिवसही जातील, अशी त्यांना आशा होती. जीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र गेलेला काळ हा खूप कठीण होता, असे त्यांचे मनोगत आहे.

बॉक्स

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

मानव हा सामाजिक प्राणी आहे. कुटुंब ही त्याची जबाबदारी असली, तरी आपुलकीची माणसे घरातच मिळतात. अशावेळी भावनिक व मानसिक त्रासात सापडलेल्या घरातील सदस्यांना कुटुंबाने काळजी घेण्याची नितांत गरज आहे.

बॉक्स

मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात

मानवी जीवन क्षणभंगूर आहे. समस्यांतून सकारात्मक दिशेने विचार करून जीवनाचे एक-एक पाऊल समोर टाकावे लागते. आलेले संकट निघून जाते, मात्र त्यावेळी दिलेला मदतीचा व भावनिक आधार जन्मभर आठवणीत राहतो. अशावेळी त्या व्यक्तीला भावनिक आधार देण्याची खूप गरज आहे. नेमक्या वेळी त्याला शब्दरूपी भावनांची साथ मिळाली, तर त्याच्या मनात कदाचित आत्महत्येसारखा विचारही येणार नाही.

डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा.