शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

-अन् त्यांनी केली पाणी टंचाईवर मात

By admin | Updated: May 27, 2016 00:55 IST

दुष्काळ, पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती, अशा बातम्या दररोज ऐकायला मिळतात. तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी मराठीत म्हण आहे.

लोकमत जलमित्र अभियान : रेनवॉटर हार्वेस्टिंगतून जलक्रांतीभंडारा : दुष्काळ, पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती, अशा बातम्या दररोज ऐकायला मिळतात. तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा बसल्यावरच आपल्याला जाग येते आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी आपण सरसावतो. पाणी उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचेच काम आहे म्हणून आपण जबाबदारी झटकून मोकळे होतात. परंतु भंडारा शहरातील नारायण कावळे यांनी आपली जबाबदारी ओळखून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे  पुनर्भरण करून त्यांच्या कॉलनीतील पाणी टंचाईच्या परिस्थितीवर मात केली आहे.भंडारा शहरातील खात मार्गावर १५ वर्षांपासून राधाकृष्ण विहार कॉलनी ही नवीन वसाहत वसलेली आहे. भूस्तरीय खडकामुळे या भागातील काही भागात जलस्तर चांगला तर काही भागात तिनशे फूट खोलीवरही पाणी नाही. कावळे हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. त्यांनी या परिसरात घर बांधण्यासाठी नगरपरिषदकडे  घराचा नकाशा मंजुरीसाठी दिला. तेव्हा त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची अट घातली होती. पालिकेने मंजूर केलेल्या प्रत्येक नकाशात अशी अट घातली जाते. घरबांधणी करण्यापूर्वी नकाशातील रेनवॉटर हार्वेस्टिंगनंतर कुठे जाते हा प्रश्न निर्माण होतो. नारायण कावळे यांनी मात्र या अटीचे तंतोतंत पालन केले. त्यांनी पावसाचे इमारतीच्या छतावर पडणारे सर्व पाणी पाईपद्वारे विहिरीत सोडले. छतावरील धूळ , कचरा, थेट विहिरीत जाऊ नये म्हणून त्यांनी टाकीचा फिल्टरसारखा वापर केला. छतावरील पाणी पाईपद्वारे प्रथम या टाकीत जमा होते आणि फिल्टर झालेले पाणी दुसऱ्या पाईपद्वारे विहिरीत सोडले जाते. मागील आठ  वषार्पासून कावळे सतत अशाप्रकारे त्यांच्या घरातील विहिरीचे पुनर्भरण करतात. त्यामुळे त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी असते. यासाठी त्यांनी केवळ दीड हजार रुपये खर्च केले आहे. याच विहिरीतून त्यांनी शेजारच्या पाच-सहा घरांना उन्हाळ्यात पाणी पुरवठा केला. परंतु मागील दोन वर्षांपासून त्यांना शेजारच्यांना पाणी देण्याची गरज भासली नाही, कारण कावळे यांची प्रेरणा घेऊन कॉलनीतील इतर लोकानीही जल पुनर्भरणाचा प्रयोग त्यांच्या घरीसुद्धा राबविला. आश्चर्य म्हणजे आजुबाजूच्या विहीरीना आता मुबलक पाणी आहे. कावळे यांच्या घरी स्वयंपाक घरातील पाणीसुद्धा वाया न घालवता ते पाणी बागेत सोडले जाते.मुख्य म्हणजे अंगणात केवळ चालण्यापुरती फरशी बसवून पावसाचे संपूर्ण पाणी अंगणातच जिरवले जाते. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अंगणात पडणारा धो-धो पाऊस वाहून जातो. मात्र तो तिथेच जिरवला तर भूजलस्तराच्या पातळीत निश्चितच वाढ दिसून येते. . (नगर प्रतिनिधी)