शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

-अन् त्यांनी केली पाणी टंचाईवर मात

By admin | Updated: May 27, 2016 00:55 IST

दुष्काळ, पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती, अशा बातम्या दररोज ऐकायला मिळतात. तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी मराठीत म्हण आहे.

लोकमत जलमित्र अभियान : रेनवॉटर हार्वेस्टिंगतून जलक्रांतीभंडारा : दुष्काळ, पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती, अशा बातम्या दररोज ऐकायला मिळतात. तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा बसल्यावरच आपल्याला जाग येते आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी आपण सरसावतो. पाणी उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचेच काम आहे म्हणून आपण जबाबदारी झटकून मोकळे होतात. परंतु भंडारा शहरातील नारायण कावळे यांनी आपली जबाबदारी ओळखून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे  पुनर्भरण करून त्यांच्या कॉलनीतील पाणी टंचाईच्या परिस्थितीवर मात केली आहे.भंडारा शहरातील खात मार्गावर १५ वर्षांपासून राधाकृष्ण विहार कॉलनी ही नवीन वसाहत वसलेली आहे. भूस्तरीय खडकामुळे या भागातील काही भागात जलस्तर चांगला तर काही भागात तिनशे फूट खोलीवरही पाणी नाही. कावळे हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. त्यांनी या परिसरात घर बांधण्यासाठी नगरपरिषदकडे  घराचा नकाशा मंजुरीसाठी दिला. तेव्हा त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची अट घातली होती. पालिकेने मंजूर केलेल्या प्रत्येक नकाशात अशी अट घातली जाते. घरबांधणी करण्यापूर्वी नकाशातील रेनवॉटर हार्वेस्टिंगनंतर कुठे जाते हा प्रश्न निर्माण होतो. नारायण कावळे यांनी मात्र या अटीचे तंतोतंत पालन केले. त्यांनी पावसाचे इमारतीच्या छतावर पडणारे सर्व पाणी पाईपद्वारे विहिरीत सोडले. छतावरील धूळ , कचरा, थेट विहिरीत जाऊ नये म्हणून त्यांनी टाकीचा फिल्टरसारखा वापर केला. छतावरील पाणी पाईपद्वारे प्रथम या टाकीत जमा होते आणि फिल्टर झालेले पाणी दुसऱ्या पाईपद्वारे विहिरीत सोडले जाते. मागील आठ  वषार्पासून कावळे सतत अशाप्रकारे त्यांच्या घरातील विहिरीचे पुनर्भरण करतात. त्यामुळे त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी असते. यासाठी त्यांनी केवळ दीड हजार रुपये खर्च केले आहे. याच विहिरीतून त्यांनी शेजारच्या पाच-सहा घरांना उन्हाळ्यात पाणी पुरवठा केला. परंतु मागील दोन वर्षांपासून त्यांना शेजारच्यांना पाणी देण्याची गरज भासली नाही, कारण कावळे यांची प्रेरणा घेऊन कॉलनीतील इतर लोकानीही जल पुनर्भरणाचा प्रयोग त्यांच्या घरीसुद्धा राबविला. आश्चर्य म्हणजे आजुबाजूच्या विहीरीना आता मुबलक पाणी आहे. कावळे यांच्या घरी स्वयंपाक घरातील पाणीसुद्धा वाया न घालवता ते पाणी बागेत सोडले जाते.मुख्य म्हणजे अंगणात केवळ चालण्यापुरती फरशी बसवून पावसाचे संपूर्ण पाणी अंगणातच जिरवले जाते. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अंगणात पडणारा धो-धो पाऊस वाहून जातो. मात्र तो तिथेच जिरवला तर भूजलस्तराच्या पातळीत निश्चितच वाढ दिसून येते. . (नगर प्रतिनिधी)