शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

जिल्ह्यात 974 शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन शिक्षण कसे आहे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे; पण खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्यांच्याकडे आहे त्यांना इंटरनेटचा खोडा आहे. हे जरी असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभाग सांगतो.  वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ३४९ शाळेत इंटरनेट सुविधा आहे, तसेच ९७४ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडे स्मार्टफाेनचा अभाव : यू-डायस प्लसने वास्तव केले उघड

राजू बांतेलाेकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : कोविड-१९ च्या प्रभावामुळे  मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे असा आभासी दावा शालेय शिक्षण विभाग करीत आहे; पण जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ९७४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याची बाब यू-डायस प्लसला दिसून आली आहे.  मग विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कसे सुरू आहे, असा प्रश्न समोर येत आहे.‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे; पण खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्यांच्याकडे आहे त्यांना इंटरनेटचा खोडा आहे. हे जरी असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभाग सांगतो.  वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ३४९ शाळेत इंटरनेट सुविधा आहे, तसेच ९७४ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे बऱ्याच शिक्षकांकडून व्हाॅट्सॲप,  झूम मीट व शिक्षण विभागाच्या दीक्षा ॲपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविले जात आहे.  

शिक्षकांच्या माेबाईलचा आधार- शाळेत इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागते. खरं तर काही बोटावर मोजण्याइतक्या शाळा सोडल्या तर ऑनलाइन शिक्षण होत नाही, ही वास्तविकता आहे. दीक्षा ॲपमधील पीडीएफ व शाळा बंद शिक्षण सुरू ही माहिती इकडची तिकडे पाठविली जाते. यातून किती विद्यार्थी मोबाइल शिक्षण घेतात, हा प्रश्न आहे. यावर मात्र कुणाकडेही उत्तर नाही.

 शिक्षकांना माेबाईलचा आधार

मोबाइलने आकृत्या, प्रतिकृती शिकविणे अवघड आहे.   काठिण्यपूर्ण भाग शिकवूनही विद्यार्थ्यांना समजत नाही. अनेक शाळांत संगणक, प्रोजेक्टर असूनही धूळ खात आहेत. शासनाने इंटरनेटला सुविधा पुरविली पाहिजे.- सुनीता तोडकर, मुख्याध्यापिका  स्व. पुष्पलताताई तोडकर विद्यालय, नरसिंगटोला

ऑनलाइन शिक्षण   प्रभावी नाही.  फेस टू फेस शिक्षण होत नाही.   प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे अनुभवता येत नाही. त्यासाठी शाळेत विद्यार्थी आले पाहिजेत. अभासी अभ्यास विद्यार्थ्यांच्या फारसे लक्षात राहत नाही.- राजेश निनावे, सहायक शिक्षक, महात्मा ज्योतिबा फुले, धुसाळा 

ऑनलाईन शिक्षण  काय असते रे भऊ

ऑनलाइन मला माहीत नाही. गरीब असल्याने ना फोन ना टीव्ही. एक वर्षापासून शाळा बघितली नाही. आई-बाबा मजुरीला जातात. लहान बहिणीला सांभाळावे लागते. शाळा सुरू झाली पाहिजे. शाळा सुरू झाली नाही तर माझेच काय माझ्या सारख्या अनेकांचे शिक्षण थांबल्याशिवाय राहणार नाही.- अनुज मारबदे, विद्यार्थी, मोहगाव देवी

घरी मोबाईलच मग ऑनलाईन शिक्षण कस होते हे थोडेच माहीत होणार. कुणाकडून किंवा शिक्षक घरी येतात. तूम्हाला हे करायच आहे. तेंव्हा अभ्यासाबाबत माहिती होते. शाळा सुरू झाली तरच आमचे अध्ययन प्रभावी होईल.”- सेजल सार्वे, विद्यार्थीनी, कान्हळगाव

 

टॅग्स :SchoolशाळाInternetइंटरनेट