शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तिथे घराघरांतून निनादतो स्वातंत्र्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 22:28 IST

१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीण सण. झेंडावंदन, सलामी, प्रभातफेरी, घोषणा व भाषणे हा सर्वत्र दिसणारा .....

ठळक मुद्देढोलसरवासीयांची परंपरा : प्रभातफेरीचे घरोघरी केले जाते पूजन

हरिश्चंद्र कोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बुज) : १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीण सण. झेंडावंदन, सलामी, प्रभातफेरी, घोषणा व भाषणे हा सर्वत्र दिसणारा राष्ट्रीय सणाचा सर्वसाधारण परिपाठ. परंतु लाखांदूर तालुक्यातील ढोलसर या लहानशा खेडेगावाने मागील ५८ वर्षांपासून राष्ट्रीय सणाचा वेगळाच परिपाठ जपला आहे. येथे स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी प्रभातफेरीची पुजा होते व घरांघरातून निनादतो राष्ट्रपे्रमाचा जल्लोष.राष्ट्रीय सणाला गावातील प्रत्येक घरातील गृहिणी आपल्या दारासमोर सडासंमार्जन करून छान रांगोळी घालते. गावातील सर्व मार्गावरून प्रभातफेरी काढली जाते. यात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, गावातील पुढारी, तरूण वर्ग व गावकरी सहभागी होतात.एका खुर्चीवर महात्मा गांधींचा फोटो ठेऊन ती खुर्ची डोक्यावरून प्रभातफेरीसोबत फिरविली जाते. प्रत्येक दारापुढे ही प्रभातफेरी थांबते. त्या घरातील गृहिणी पंचारतीने बापूंच्या प्रतिमेला ओवाळून पूजा करते. प्रभातफेरीतील ज्येष्ठांना देखील पंचारतीने ओवाळले जाते. त्यानंतर प्रत्येक घरातून प्रसाद घेतला जातो. विद्यार्थ्यांकडून ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जातात. त्यानंतर ही प्रभातफेरी पुढच्या दाराजवळ थांबते. पुन्हा तशीच ओवाळणी आणि तशाच घोषणा देत ही प्रभातफेरी गावभर फिरते. घरोघरी फिरून स्वातंत्र्याचा जयघोष करते. येथील वयोवृद्ध नागरिक देवराव बगमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे सन १९५९ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू झाली. त्यावेळी तत्कालीन सरपंच गोविंदा बगमारे आणि पोलीस पाटील सीताराम वाढई यांनी राष्ट्रीय सणाला गावकºयांनी आपापल्या दारापुढे प्रभातफेरीची पूजा करावी असा निर्णय घेतला आणि गावात दवंडी देवून गावकºयांना अशा पद्धतीने राष्ट्रीय सण साजरा करण्याचे आवाहन केले तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अविरत सुरू आहे.यावर्षीही त्याच परंपरेनुसार येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल, असे सरपंच जगन हुकरे यांनी सांगितले. ही पंरपरा येथे अखंडपणे सुरू असताना ढोलसरवासीयांना आपण काहीतरी वेगळे करत असल्याचा मागमुसही नाही. राष्ट्रीय सणाला धार्मिक उत्सव आणि उत्साहाची जोड देऊन या गावाने अमिट ठसा उमटविला आहे. राष्ट्रभक्ती जोपासण्याचा संदेश पुढारी देतात. मात्र या गावकºयांकडून प्रत्यक्ष कृतीतून दिला जाणारा हा संदेश प्रशंसनीय असाच म्हणावा लागेल.