शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

९३ लाख रुपये खर्चुनही वर्षभरापासून जलकुंभ कोरडाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:56 IST

कामे अर्धवट : तामसवाडीतील नागरिक पाण्याअभावी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तामसवाडीत जलजीवन मिशन हर घर नल योजनेत ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले. वर्षभरापासून जलकुंभात पाणीच आले नाही. वैनगंगा नदीकाठावर गाव असताना गावकरी तहानलेलेच आहेत. जलजीवन मिशनच्या कामात मोठी अनियमितता झाली असल्याने अन्य गावांतही या योजनेवर ताशेरे ओढले जात आहेत.

योजनेचे काम १ मार्च २०२३ ला सुरू करण्यात आले. योजनेवर ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात विंधन विहीर बांधकामात ८४ हजार रुपये खर्च दाखविण्यात आले आहे. ट्यूबवेलच्या कामात २ लाख २३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असला, तरी गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. पम्पिंग मशिनरी १ लाख ३८ हजार आणि पंपगृहच्या निर्मितीसाठी २ लाख ५८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. याशिवाय उर्ध्व नलिका १४ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

गावात पाणीपुरवठा करण्यासाठी वितरण नलिका देण्यात आलेल्या आहेत. यात सर्वाधिक ३९ लाख १७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गावात अभिनव टाकी उभी आहे. ही योजना बंद झाली असल्याने गावात अशा टाकी उभ्या आहेत. याच टाकीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. 

या कामात ३ लाख ४७ हजार रुपयांची उचल करण्यात आली आहे. गावात नवीन टाकी जलकुंभ नव्याने बांधकाम करण्याची जुनी ओरड असताना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. नळजोडणीच्या कामात ६ लाख ६८ हजार, तर योजना चालविण्यासाठी ७८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु योजनेच्या यशस्वीतेसंबंधाने व्यापक उपाययोजना झालेल्या नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

२०० कुटुंबे आजही नळ कनेक्शनच्या प्रतीक्षेतगावातील नळयोजना गावकऱ्यांना पाणीपुरवठा करीत असले तरी नळ कनेक्शनधारकांची मागणी ३५० कुटुंबांची आहे. गावात फक्त १५० कुटुंबीयांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. २०० कुटुंबे आजही नळ कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. या कुटुंबीयांना नळ कनेक्शन देण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना मंजूर करण्यात आली आहे.

हर घर नलचे स्वप्न भंगलेगावात हर घर नल देण्यात येणार असल्याने गावकरी उत्सुक झाले होते. या योजनेचे पाणी जलकुंभात पोहचले नाही. योजना यशस्वी झाली नसल्याने वसुली कुणाचे खिशातून करायचे असा सवाल गावात विचारले जात आहेत. पाणी पुरवठा होत नसल्याने खापर मात्र पदाधिकाऱ्यांवर फोडले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततामध्ये लक्ष घातले पाहिजे. अशी मागणी आहे.

६० फूट खोल बोअरवेल्स खोदकाम करण्यात आली आहे.गावात जलकुंभात पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरवेल्स खोदकाम केले. मात्र बोअरवेल्स कोरडीच निघाली आहे. त्यामुळे समस्येत भर पडली आहे.

"गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना गावकऱ्यांना अभिशाप झाली आहे. योजनेच्या कामात रस्ते फोडले आहेत. योजनेवर लाखो रुपये खर्च झाले. परंतु एक थेंब पाणी नळाला पोहचले नाही. कंत्राटदारांनी मनमर्जीनुसार कामे केली."- अनिल वासनिक, उपसरपंच, तामसवाडी

टॅग्स :bhandara-acभंडारा