शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

९३ लाख रुपये खर्चुनही वर्षभरापासून जलकुंभ कोरडाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:56 IST

कामे अर्धवट : तामसवाडीतील नागरिक पाण्याअभावी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तामसवाडीत जलजीवन मिशन हर घर नल योजनेत ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले. वर्षभरापासून जलकुंभात पाणीच आले नाही. वैनगंगा नदीकाठावर गाव असताना गावकरी तहानलेलेच आहेत. जलजीवन मिशनच्या कामात मोठी अनियमितता झाली असल्याने अन्य गावांतही या योजनेवर ताशेरे ओढले जात आहेत.

योजनेचे काम १ मार्च २०२३ ला सुरू करण्यात आले. योजनेवर ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात विंधन विहीर बांधकामात ८४ हजार रुपये खर्च दाखविण्यात आले आहे. ट्यूबवेलच्या कामात २ लाख २३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असला, तरी गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. पम्पिंग मशिनरी १ लाख ३८ हजार आणि पंपगृहच्या निर्मितीसाठी २ लाख ५८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. याशिवाय उर्ध्व नलिका १४ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

गावात पाणीपुरवठा करण्यासाठी वितरण नलिका देण्यात आलेल्या आहेत. यात सर्वाधिक ३९ लाख १७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गावात अभिनव टाकी उभी आहे. ही योजना बंद झाली असल्याने गावात अशा टाकी उभ्या आहेत. याच टाकीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. 

या कामात ३ लाख ४७ हजार रुपयांची उचल करण्यात आली आहे. गावात नवीन टाकी जलकुंभ नव्याने बांधकाम करण्याची जुनी ओरड असताना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. नळजोडणीच्या कामात ६ लाख ६८ हजार, तर योजना चालविण्यासाठी ७८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु योजनेच्या यशस्वीतेसंबंधाने व्यापक उपाययोजना झालेल्या नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

२०० कुटुंबे आजही नळ कनेक्शनच्या प्रतीक्षेतगावातील नळयोजना गावकऱ्यांना पाणीपुरवठा करीत असले तरी नळ कनेक्शनधारकांची मागणी ३५० कुटुंबांची आहे. गावात फक्त १५० कुटुंबीयांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. २०० कुटुंबे आजही नळ कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. या कुटुंबीयांना नळ कनेक्शन देण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना मंजूर करण्यात आली आहे.

हर घर नलचे स्वप्न भंगलेगावात हर घर नल देण्यात येणार असल्याने गावकरी उत्सुक झाले होते. या योजनेचे पाणी जलकुंभात पोहचले नाही. योजना यशस्वी झाली नसल्याने वसुली कुणाचे खिशातून करायचे असा सवाल गावात विचारले जात आहेत. पाणी पुरवठा होत नसल्याने खापर मात्र पदाधिकाऱ्यांवर फोडले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततामध्ये लक्ष घातले पाहिजे. अशी मागणी आहे.

६० फूट खोल बोअरवेल्स खोदकाम करण्यात आली आहे.गावात जलकुंभात पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरवेल्स खोदकाम केले. मात्र बोअरवेल्स कोरडीच निघाली आहे. त्यामुळे समस्येत भर पडली आहे.

"गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना गावकऱ्यांना अभिशाप झाली आहे. योजनेच्या कामात रस्ते फोडले आहेत. योजनेवर लाखो रुपये खर्च झाले. परंतु एक थेंब पाणी नळाला पोहचले नाही. कंत्राटदारांनी मनमर्जीनुसार कामे केली."- अनिल वासनिक, उपसरपंच, तामसवाडी

टॅग्स :bhandara-acभंडारा